वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:31 PM2021-06-05T21:31:11+5:302021-06-05T21:41:23+5:30

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

Heavy rains, damage to houses, letters from companies flew away in sangali and shirala | वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

Next
ठळक मुद्देमुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे.

सांगली/शिराळा - येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊस व वाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील तीन मुली, एक महिला तर भटवाडी येथील एक महिला असे पाच जण जखमी झाले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय २३ रा.थावडे,  ता शाहूवाडी जि कोल्हापूर ) या गंभीर जखमी आहेत. रस्त्यावर, सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे भयावह दृश्य दिसत होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इकोराईज बायो फर्टिलयझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेले. त्यामध्ये मेघा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा), सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागून तर नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा) यांचे दोन्ही हात फॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच, घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीचे इमारतीचे पत्रे उडून गेले आणि भिंतही कोसळली. 

मुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर आणखी ३-४ कंपन्या ज्यांचे इमारतीचे काम सुरू आहे, अश्या नवीन कंपनीचे शेड उडून गेले आहेत. एक दोन किलोमीटर पत्रे उडून शेतात जाऊन पडले तर काही विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते. पावसामुळे ही दाणादाण उडाली, सर्वत्र रस्त्यावर, कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
  
या औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच घराचा छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण या जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

घरांचेही नुकसान

भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, अकाराम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. 
 

Web Title: Heavy rains, damage to houses, letters from companies flew away in sangali and shirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.