शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 19:09 IST

राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती.

पुणे : राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. मात्र,केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार ते सहा हजार कोटी रुपये वाचले आहेत. तो खिशात घेऊन फिरणाऱ्या सहा हजार कोटींच्या चेकचं काय? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

पुण्यात एका आयोजित कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील म्हणाले,मागच्या पाच वर्षात खिशात आमदारकीचे राजीनामे घेऊन फिरणारे लोक ह्यावेळी १२ कोटी लस एकरकमी खरेदी करण्याच्या उद्देशाने सहा हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होते. मात्र केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचे ठरवल्याने आता ते ६ हजार कोटी रुपये  काय करणार? ते मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी वापरणार? चक्री वादळात नुकसान झालेल्यांना वाटणार ?की गेल्या सव्वा ते दीड वर्षात कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या दुर्बल घटकांच्या खात्यात जमा करणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीवर आणि केलेल्या मागण्यांसंबंधी देखील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले,राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे. केंद्र सरकारच्या हातात मराठा आरक्षणासंबंधी काहीच नाही. मात्र, राज्य सरकारला समिती स्थापन करून प्रचंड सर्व्हे करून सर्वात अगोदर मराठा समाजाला मागास ठरविण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याच दरम्यान,राज्य सरकारने भाजपच्या सत्ताकाळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या होत्या त्या तरी द्यायला हव्यात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमचे हात कुठे बांधलेत ? असे मत पाटील यांनी व्यक्त केले, तसेच मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत यासाठी जो खर्च येणार आहे तो ३ हजार इतकाच आहे. ते द्या ना. अजित पवार हे फार ऑन द स्पॉट निर्णय घेण्यासाठी चर्चेत असतात. मग त्यांनी तरी आता निर्णय घ्यावा. 

कोरोनाची बंधने आहेत म्हणून लोक शांत आहे. तरीदेखील आपापल्या परीने त्यांची आंदोलनेे सुरु आहेत. मात्र जर हे निर्बंध तुम्ही उठवलीत तर लोकांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मराठा व ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार