West Bengal Assembly Elections 2021 : "भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:30 PM2021-04-01T14:30:04+5:302021-04-01T14:34:44+5:30

Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021 : "पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत."

Shivsena Sanjay Raut And TMC Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021 | West Bengal Assembly Elections 2021 : "भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

West Bengal Assembly Elections 2021 : "भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

Next

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut ) यांनी देशातील चार राज्यांच्या निवडणुका या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. खासकरून पश्चिम बंगाल आणि आसाम असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections 2021) भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करु नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021

"पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम….केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. "या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करू. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरू केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल" असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

"लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करू नये"

लॉकडाऊनबाबत ही राऊतांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यांनी त्यावरही उत्तर दिलं आहे. "लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करू नये. राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जनतेच्या हिताचं सांगत आहेत. सगळ्या विरोधी पक्षाच्या घटकपक्षांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे" असं म्हटलं आहे. तसेच "पंतप्रधान मोदी यांनी काय प्रेमाने, आनंदाने लॉकडाऊन केला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील कठोर निर्बंध लावू इच्छित आहे, ती काही त्यांच्यासाठी आनंदाची बाब नाही. पण काय करणार?" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'

पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल (Pralay Pal) यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. मात्र याता यावर ममता बॅनर्जींनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. "हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता" असं म्हणत त्यामागचं नेमकं कारण आता ममतांनी सांगितलं आहे. टीएमसीने आधी या फोनचा दावा फेटाळून लावला होता. पण आता ममता बॅनर्जींनी फोन केल्याचं समोर आलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी "तृणमूल काँग्रेसच्या एका माजी नेत्याला ज्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला आपण फोन केला होता. फोन करणं कुठलाही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवलं पाहिजे, त्यांनी विश्वासघात केला आणि चर्चा लीक केली" असं म्हटलं आहे. तसेच "हो, मी नंदीग्राममधील एका भाजपा नेत्याला फोन केला होता. कोणाला तरी आपल्याशी बोलायचं, असं सांगण्यात आलं होतं. यामुळे त्यांचा नंबर घेऊन आपण फोन केला होता. तुम्ही तिथे व्यवस्थित राहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असं मी त्यांना म्हणाले होते. हा काय माझा गुन्हा आहे का?" असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी केला आहे. 

 

Web Title: Shivsena Sanjay Raut And TMC Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.