"ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"

By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 07:53 PM2021-01-18T19:53:49+5:302021-01-18T20:05:54+5:30

Maharashtra Gram Panchayat Election Results Update : सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. तसेच राज्यातील ग्रामीण राजकारणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results : "This is the foundation of victory in Thane, Navi Mumbai, Mumbai Municipal Corporation." - Ashish Shelar | "ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"

"ही तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील विजयाची पायाभरणी,"

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहेरत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार

मुंबई - सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता पूर्ण होत आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना कडवी टक्कर देत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयानंतर भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले भरघोस यश हे नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयाची पायाभरणी आहे, असा दावा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ग्रामपंयाचत निववडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातील जनतेने भाजपाला भरभरून यश दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे. तर केवळ २० ठिकाणी शिवसेना जिंकली आहे. रत्नागिरीमध्ये सुमारे ५३६ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. जिलेबी फाफडाचे राजकारण करू पाहत होते, नौटंकी करू पाहत होते. त्याला मालवणी खाजाने उत्तर दिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात केवळ भाजप याचा अर्थ आता नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ भाजपचाच झेंडा फडकणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.



कणकवली विधानसभा मतदार संघात ३९ पैकी २७ तर सावंतवाडी १६ पैकी ९ तसेच कुडाळ १५ पैकी ९ अशा एकूण ७० पैकी भाजपाने ४५ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज! कोकण म्हणजे "आम्हीच" म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण झाले आहे, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : "This is the foundation of victory in Thane, Navi Mumbai, Mumbai Municipal Corporation." - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.