“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:46 PM2021-07-26T14:46:19+5:302021-07-26T14:47:20+5:30

देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance | “हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

“हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

googlenewsNext

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसेसोबतच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची असल्याची सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance)

मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, भाषेच्या संदर्भातील त्यांची भूमिका भाजपला मान्य नाही, असे सांगताना हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडील काळात मनसेने तशी भूमिका घेतली आहे. मात्र, भाषेसंदर्भातील भूमिका मनसेने बदलली, तर विचार करता येऊ शकतो. पण, आताच्या घडीला मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

“भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही”; देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच सुनावले

भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

“पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

दरम्यान, सोलापूरमधून मराठवाड्याला पाणी कस नेता येईल याबाबत वर्ल्ड बँक सोबत बैठकीत प्रस्ताव होता. त्यावर सरकारने विचार करायला हवा. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा अजूनही पाण्याखाली असल्याचे समजले. आलमट्टी धरणातून ५ ते ६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले. दुसरीकडे साखर कारखाने जगले पाहिजेत. ज्यांनी बुडवले त्यांना मदत द्यायची आणि बुडवणाऱ्यांना संधी का द्यायची, अशी विचारणा करत हे योग्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 
 

Web Title: devendra fadnavis says mns is not our enemy and react over bjp alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.