मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला ! अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला, सुदैवानं जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:58 AM2017-12-29T10:58:53+5:302017-12-29T11:09:48+5:30

मध्य रेल्वेवर शुक्रवारी (29 डिसेंबर) सकाळी मोठा अपघात होता होता टळला आहे. अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रुळच तुटला.

रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

वाहतूक विस्कळीत झाल्यानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आल्यानं यामुळे सुदैवानं मोठा अपघात टळला आहे.

अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.