भारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:28 AM2020-12-01T11:28:20+5:302020-12-01T11:45:42+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलने भारतीला द कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला. पण याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कॉमेडीअन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला एनसीबीने ड्रग्स घेतल्याप्रकरणी अटक केली होती. भारती आणि हर्षच्या घरून एनसीबीला छापेमारीत गांजा सापडला होता. ज्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं आणि यावेळी त्यांनी गांजा सेवन केल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. अशात चर्चा होती की, भारतीला 'द कपिल शर्मा शो'मधून काढण्यात आलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलने भारतीला द कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला. पण याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबत कॉमेडिअन किकू शर्माने सांगितले की, असं काहीही झालं नाही. आता कृष्णा अभिषेक भारतीच्या सपोर्टमध्ये समोर आला आहे.

ईटाइम्ससोबत बोलताना कृष्णा अभिषेकने सुद्धा ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. कृष्णा म्हणाला की, 'चॅनलकडून असं कोणतंही पाउल उचलण्यात आलेलं नाही. कपिल आणि मी नेहमीच भारती सिंहसोबत उभे राहू. मग काहीही झालं तरी चालेल. जर असं काही झालं तर मी भारतीच्या सपोर्टमध्ये उभा राहीन. तिला कामावर परत यावंच लागेल. तिला माझा पूर्ण सपोर्ट असेल'.

२७ नोव्हेंबरला झालेल्या शूटमध्ये भारती सहभागी झाली नव्हती. याबाबत कृष्णा म्हणाला की, 'मला वाटतं की, तिची तब्येत ठीक नाही. तिला स्वत: शूटींग करायचं आहे. ती आली असती. आम्ही एका परिवारासारखे आहोत'. दरम्यान कृष्णा भारतीला आपली बहीण मानतो. तो भारती आणि हर्षला तुरूंगात आल्यावर त्यांच्या घरी भेटायला गेला होता.

कृष्णा याबाबत म्हणाला की, 'ते परत आल्यावर मी त्यांना भेटलो. आमची मैत्री फार जुनी आहे. आमचं नातं प्रोफेशनलच्या पुढे आहे. मी हर्षला त्याच्या स्ट्रगल दिवसात पाहिलं आहे. माझ्यासमोर दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं आणि मी त्यांचं लग्न होस्ट केलं होतं. आरती सोडून माझी कुणी बाहेर बहीण असेल तरी केवळ भारती आहे'.

कृष्णाने सांगितलं की, कशाप्रकारे कठिण काळात भारतीने त्याला साथ दिला होती. तो म्हणाला, 'भारती प्रत्येक चांगल्या-वाईट काळात माझ्यासोबत उभी राहिली आहे. माझे वडील आजारी असताना मला येऊन भेटणारी ती पहिली व्यक्ती होती आणि ते गेल्यावरही ती आली होती. मी मनीष पॉलसोबत एक अवॉर्ड शो करत होतो तेव्हा मी आजारी पडलो तर तिने कशाचाही विचार न करता मााझ्या जागी काम केलं होतं. त्यामुळे ती तुरूंगातून परतल्यावर मला तिला भेटायचंच होतं. मला बाकी लोकांचं माहीत नाही पण मी भारतीच्या बाजूने उभा आहे'.

कृष्णा अभिषेकचं मत आहे की, प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधी मिळायला हवी. भारती तुरूंगात गेल्यावर अनेक लोक टीका करत होते. ज्याने कृष्णा दुखावला. यात त्याला सर्वात जास्त वाईट राजू श्रीवास्तवच्या बोलण्याचं वाटलं होतं. कृष्णा म्हणाला की, 'राजू श्रीवास्तव फार वाईट बोलला. जे तो बोलला ते हैराण करणारं होतं'.

कृष्णा पुढे म्हणाला की, 'त्याने आयुष्यभरासाठी सर्वांसोबतचं नातं खराब केलं आहे. आमची संपूर्ण टीम त्याच्या अशा बोलण्याने नाराज आहे'. राजू श्रीवास्तवने ड्रग्स प्रकरणी भारती आणि तिचा पती हर्षला ट्रोल केलं होतं. एका व्हिडीओ राजू श्रीवास्तव भारतीला लल्ली झाली टल्ली असं म्हणाला होता.

तेच कीकू शारदा म्हणाला की, भारती केवळ एका एपिसोडच्या शूटसाठी आली नव्हती. पण हे नॉर्मल आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये भारतीला रोल असतोच असं नाही. काही कारण असेल ज्यामुळे ती आली नाही. आम्हाला चॅनलने भारतीला शोमधून काढलं अशी काहीही बातमी समजली नाही.