लग्नानंतर संसारात बिझी झाल्या टीव्हीच्या प्रसिद्ध संस्कारी बहू, अभिनयक्षेत्रापासून झाल्या दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:12 PM2021-05-18T19:12:04+5:302021-05-18T19:27:29+5:30

टीव्ही सीरियलच्या जगातही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मालिकेत साकारलेल्या भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. करिअर ऐनभरात असताना लग्नानंतर त्यांनी सीरियलमध्ये काम करणे बंद केले आणि संसारात रमल्या, अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

कांची कौल-'एक लड़की अनजानी सी', 'एक ननद की खुशियों की 'चाबी मेरी भाभी जैसी' मालिकांमध्ये कांची कौलला चांगलीच पसंती मिळाली होती. कांची कौलने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालियाशी लग्न केले आणि त्यानंतर कांची कौल टीव्ही मालिकांपासून दूर गेली.

मिहीका वर्मा- 'विरूद्ध', 'कितनी मोहब्बत हैं', 'तुझ संग प्रीत लगाई सजना', 'किस देश में हैं मेरा दिल', 'ये हैं मोहब्बतें' सारख्या मालिकेत झळकली आहे.आनंद कपाईसह लग्न केल्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली.

दिशा वकानी- 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये दया भाभी पुन्हा कधी झळकणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दया भाभी कधी झळकणार याचे उत्तर निर्मांत्यांकडेही नाही. दिशाने मालिका सोडल्याच्या रोज चर्चा होतात. मात्र खुद्द दिशाकडून यावर कोणतेच स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे दिशाने मालिका सोडली आहे की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

मोहेना कुमारी सिंह 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून मोहेनाला खूप पसंती मिळाली.मोहेनानेदेखील अभिनय क्षेत्रापासून दूर जात लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली.मोहेनाने 15 ऑक्टोबर 2019 रोजी हरिद्वारमध्ये उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचे धाकटे पुत्र सुयश रावत यांच्याबरोबर लग्न केले आहे. मोहेनही रीवाचे महाराजा पुष्पराज सिंग जुदेव यांची मुलगी आहे.

अदिती शिरवाइकर मलिक-अदितीने टीव्ही अभिनेता मोहित मलिकसह लग्न केले आहे.अदिति ने 'कहानी घर घर की', 'शरारत से शरारत', 'कुमकुम', 'मिली', या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारली आहे. नुकतेच अदितीने बाळाला जन्म दिला आहे.अदिती आणि मोहित यांचे हे पहिले बाळ आहे.