पुरानंतर आता अवकाळी पावसाने केला पिकाचा घात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:14 PM2019-11-05T12:14:08+5:302019-11-05T12:24:51+5:30

ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच पिकांना बसला आहे. (सर्व फोटो - भालचंद्र जुमलेदार)

पनवेल, उरण तालुक्यातील भात शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे.

पुरामध्ये आधीच भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सरकारच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.

रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीची पाहणी केली आहे.

कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.