कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून शहरातील शाळा बंद होत्या. आजपासून (4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होत आहेत. यामध्ये शाळा सुरू होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. खूप दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाल्या नंतर मुलांमध्ये उत्साह दिसून आला. विद्यालयात रांगेत येऊन मुलांनी हातावर सॅनिटायझर लाऊन प्रवेश देण्यात आला. (फोटो- अतुल मारवाडी)