खेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 09:16 PM2018-09-20T21:16:54+5:302018-09-20T21:19:22+5:30

अंजली भागवत: महाराष्ट्राच्या अंजली भागवतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 31 सुवर्णपदके पटकावली आहेत.

मेरी कोम: मेरीने आतापर्यंत तब्बल पाचवेळा विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे.

अंजू बॉबी जॉर्ज: अंजूने 2002 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

कर्णम मल्लेश्वरी: मल्लेश्वरी ही वेटलिफ्टिंग खेळात भारताला पदक जिंकवून देणारी पहली महिला ठरली आहे. खेलरत्न पुरस्कार पटकावणारी ती पहिली महिला आहे.