मिठागरांमध्ये लगबग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 07:10 PM2019-06-13T19:10:42+5:302019-06-13T19:20:13+5:30

नवी मुंबई : मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नाही, त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागावे असे म्हणतात. कोकण किनारपट्टी, पेण, वाशी खाडी, ठाणे-उरण हा परिसरात एकेकाळी भातशेतीसोबतच मिठाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होता. मात्र, मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराच्या विकास करण्यात आल्यावर शेती नामशेष झाली. पण, ठाणे-ऐरोली पट्ट्यात आजही मिठाची शेती केली जाते. पावसाळा अवद्या काही दिवसांवक आल्याने मिठागरांमध्ये सध्या कामगारांची लगबग सुरु आहे. भरती ओहोटीच्या वेळा सांभाळून कामगार मीठ गोळा करण्यास व्यस्त आहेत. (सर्व फोटो - संदेश रेणोसे)