CoronaVirus News : सलाम! ....म्हणून वडिलांसाठी 'ती' झाली श्रावणबाळ; 7 दिवस केला तब्बल 1000 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:10 PM2020-05-20T16:10:46+5:302020-05-20T16:34:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या सोशल मीडियावर काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. एक 15 वर्षांची मुलगी ही आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे.

कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

देशभरात 31 मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 3303 वर पोहोचली आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पर्याय वापरून ते आपलं गाव गाठत आहेत. मात्र याच दरम्यान हृदयद्रावक घटना या समोर येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. एक 15 वर्षांची मुलगी ही आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे.

ज्योती कुमारी असं या 15 वर्षीय मुलीचं नाव असून तिने आपले वडील मोहन पासवान यांना घेऊन सायकलवरून 7 दिवस तब्बल 1000 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.

ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर डबलसीट घेऊन गुरुग्राम ते बिहार असा प्रवास केला आहे. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरून पूर्ण केला.

ज्योती शाळेत शिकते. तर तिचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र त्याचा अपघात झाला आणि ते जखमी झाले.

लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करायचा असं ठरवलं.

ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एक सायकल देखील खरेदी केली.

सायकलसाठी ज्योतीकडे पैसे नव्हते मात्र दुकानदाराला नंतर पैसे देते असं सांगून तिने सायकल घेतली आणि आपला प्रवास सुरू केला.

आजारी वडिलांना घेऊन तिने गुरुग्राममधून सायकलने आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.