दुर्दैव! आपल्या पैशांतून घेतलेल्या सरकारी गाड्या गेल्या भंगारात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 05:41 PM2018-02-06T17:41:06+5:302018-02-06T17:50:24+5:30

नागरिकांच्या करातून गोळा केलेल्या पैशांतून सरकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींना गाड्या घेऊन दिल्या जातात.

त्या चांगल्या पद्धतीने वापरल्या जात नाहीत, खाजगी कामासाठी वापरल्या जातात, अशा तक्रारी वारंवार होतात.

जेव्हा एखादी नवी गाडी खरेदी केली जाते तेव्हा सुस्थितीत असलेली आधीची गाडी वापराअभावी धूळखात पडून राहते.

त्या गाडीला कालांतराने गंज लागतो, नंतर पार भंगारात काढली जाते.

त्यातून वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांत कराच्या पैशांची लाखोंची उधळपट्टी केली जाते.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अशाच पद्धतीने पडून असलेल्या गाड्या आम्ही टिपल्या आहेत.