मुलीचे अपहरण करून सहा वेळा विकले; अखेर तिने संपवून घेतले स्वतःला 

By पूनम अपराज | Published: February 9, 2021 09:23 PM2021-02-09T21:23:49+5:302021-02-09T21:38:29+5:30

Human trafficking : मध्य प्रदेश छतरपूर पोलिसांवर एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आणले आहे. आंतरराज्यीय मानव तस्करिचा भांडाफोड केला आहे. हे मानव तस्करीच्या गुन्ह्यात ८ जणांना अटक करण्यात आली आहेत. पोलिस म्हणाले की, या गुन्ह्यात एक महिला देखील समाविष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलै 2020 रोजी छत्तीसगड राज्यातील सुजी बहार क्षेत्र कांसाबेल जिल्हा जशपूरची १८ वर्षीय युवतीचे अपहरण झाले. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश राज्यातील आठ गुन्हेगारांनी या अपहरण प्रकरणी अटक केली. (All photo - AajTak)

त्यानंतरच्या आरोपींनी मुलीला मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात सहा वेळा विकले. प्रथम मुलगी ७ हजार रुपयांना विकली गेली आणि सहाव्या वेळी मुलगी उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातील खिरिया येथील संतोष कुशवाह यांना 70 हजार रुपयांना विकली गेली. संतोष कुशवाहने आपलय मनोरुग्ण असलेल्या बबलू या मुलाशी जबरदस्तीने लग्न केले होते आणि लग्नाच्या 2 महिन्यांनंतर 10 सप्टेंबर 2020 रोजी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली.

मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ललितपूर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता आणि या प्रकरणात बबलूचे वडील संतोष कुशवाह यांना अटक करण्यात आली होती आणि बबलू घटनास्थळावरून फरार झाला होता. दुसरीकडे, मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी छत्तीसगडमध्ये हरवल्याची घटना दाखल केली. त्याबाबत छत्तीसगड पोलिस सतत त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते.

छत्तीसगड पोलिसांना मुलीचा सुगावा लागताच 4 फेब्रुवारी 2021 रोजी कंसाबेलची टीम छतरपूरला पोहोचली. जिथे छत्तरपूर एसपी सचिन शर्मा यांनी छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने स्वत: ची एक टीम तयार केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, अपहरण प्रकरणात गढी मल्हारा पोलिस स्टेशन भागातील अजय आणि त्याची पत्नी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या टोळीत कार्यरत ८ सदस्यांना अटक करण्यात छतरपूर पोलिसांना यश आले आहे. सर्व आंतरराज्यीय गॅंगशी संलग्न असलेल्या आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले.

मुलीच्या आत्महत्या झाल्यानंतर ललितपुर पोलिसात ही घटना नोंदविली गेली आणि या प्रकरणात बबलूचा बाप संतोष कुशवाहाला अटक झाली आणि तिथून बबलू फरार झाला.