दीड महिन्यांपूर्वी बहिणीचे लग्न दिले लावून, आता भावांनी भावोजीला ठार मारले 

By पूनम अपराज | Published: January 3, 2021 08:01 PM2021-01-03T20:01:51+5:302021-01-03T20:07:32+5:30

Murder : बहिणीने शेजाऱ्यासोबत प्रेम विवाह केला. तेव्हा संतप्त झालेल्या भावांनी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला चाकू भोसकून ठार मारले. ही घटना हरियाणाच्या पानीपतमधील भावना चौकातील आहे. या भीषण घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

असा आरोप केला जात आहे की, मुलीच्या भावांनी या तरुणाला बोलवून ठार मारले. या मृत युवकाच्या शरीरावर चाकूच्या 12 खुणा आहेत. लोकांची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. पोलिस सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या सहाय्याने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. फुटेजनुसार दोन तरुणांनी ही घटना घडवून आणली आहे. (All Photos - Amar Ujala)

मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय नीरजचा हा गुलशन कुमार बधवा यांचा मुलगा असून तो राम कॉलनी पालिका बाजारमधील हातमाग दुकानात विक्रीचा व्यवसाय करीत होता. दीड महिन्यापूर्वी पानीपत कोर्टात नीरजने त्याच्या शेजारी राहणाऱ्या कोमलसोबत प्रेम विवाह केला. यामुळे कोमलचे वडील काश्मीर सिंह, भाऊ अजय आणि विजय नाराज होते.

आरोपी यांनी यापूर्वीही अनेकदा नीरजचा भाऊ जगदीशवर हल्ला केला होता. नीरज आणि त्याचा भाऊ यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. किला पोलिस स्टेशनने या संदर्भात योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप केला जात आहे. ज्यामुळे आरोपींना हे हत्येचे कृत्य करण्यास चालना मिळाली. काही दिवसांपूर्वी कोमलचा मामा भाऊ पवननेही नीरजला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपींनी नीरजला फोन करून भावना चौकात बोलावून चाकूने हल्ला केला. जागीच नीरजचा मृत्यू झाला. जगदीश यांनी सांगितले की, नीरज चार भावांमध्ये तिसरा होता. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.