भारताचा 'हा' हॉकीपटू Yo-Yo चाचणीत विराट कोहलीवर भारी!

२०१७च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर टीम इंडियात निवड होण्यासाठी खेळाडूंना Yo-Yo चाचणी पास करणे अनिवार्य केले. जो खेळाडू ही चाचणी पास करेल, त्याला संघात स्थान मिळेल.

कर्णधार विराट कोहली हा भारताचा सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच युवा पिढीला विराटच्या फिटनेसचे आकर्षण आहे.

पण, विराटवरही Yo-Yo चाचणीत तीन खेळाडू भारी पडले आहेत. त्यापैकी एक खेळाडू हा टीम इंडियाचा हॉकीपटू आहे आणि त्याच्या तंदुरुस्तीशी विराटची तुलना होणे नाही.

मनीष पांडे Yo-Yo चाचणी विराटला टक्कर देतो. मैदानावरील त्याचे चापल्य हे विराटलाही मागे टाकणारे आहे आणि त्याची प्रचिती त्यानं अनेकदा दिली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार कोहलीनं Yo-Yo चाचणीत १९ गुणांची कमाई केली होती. पण, मनीष पांडेचे गुण हे १९.२ इतके होते. युवराज सिंगला तेव्हा Yo-Yo चाचणी पास करता आली नव्हती.

मयांक डागर हे नाव अनेकांनी ऐकलेही नसेल. पण, त्यानेही २०१८च्या Yo-Yo चाचणीत १९.३ गुणांची कमाई करताना विराटसह मनीषलाही मागे टाकले होते.

हिमाचल प्रदेशचा हा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे.

करुण नायरचे Yo-Yo चाचणीतील गुण माहीत नसले तरी भारतीय संघाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांच्यामते तो संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे.

भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग हा या सर्वांवर भारी ठरतो. त्यानं Yo-Yo चाचणीत २१.४ गुणांची कमाई केली आहे आणि त्यानं स्वतःचा २१.३ गुणांचा विक्रम मोडलाय.