Prithvi Shaw : पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral

Vijay Hazare Trophy 2021 : Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

Mumbai won Vijay Hazare title 2021: मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. उत्तर प्रदेशनं विजयासाठी ठेवलेलं ४ बाद ३१२ धावांचे लक्ष्य मुंबईनं ४१.३ षटकांत ४ बाद ३१५ धावा करून पार केलं. ( Mumbai vs Uttar Pradesh)

दुखापतग्रस्त असूनही कर्णधार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) मैदानावर फलंदाजीला आला अन् वादळासारखा घोंगावला. त्याच्या आक्रमक खेळीनंतर आदित्य तरेनं ( Aditya Tare) नाबाद शतकी खेळी करून मुंबईला जेतेपद जिंकून दिलं. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) तरेनं नाबाद ११८ धावा केल्या. पृथ्वीनं ३९ चेंडूंत ७३ धावा चोपल्या.

प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघानं ४ बाद ३१२ धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक यानं १५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारासह १५८ धावा केल्या. समर्थ सिंग ( ५५) आणि अक्ष दीप नाथ ( ५५) यांच्या अर्धशतकानं उत्तर प्रदेशला मोठा पल्ला गाठून देण्यात हातभार लावला.

दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ ( Mumbai Captain Prithvi Shaw) याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. आतापर्यंत दमदार फॉर्मात असलेल्या पृथ्वीला दुखापत झाल्यानं मुंबईचं टेंशन वाढलं होतं, परंतु तो मैदानावर उतरला अन् वादळा सारखा घोंगावला.

पृथ्वीनं ३९ चेंडूंत १० चौकार व ४ षटकार खेचून ७३ धावांची वादळी खेळी केली. शिवम मावीनं त्याला बाद केलं. पण, या खेळीच्या जोरावर पृथ्वीनं इतिहास रचला. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यानं ८ सामन्यांत १६५.४० च्या सरासरीनं ८२७ धावा. त्यानं १ द्विशतक, ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकावली.

२०१८मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता आणि आज त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईनं विजय हजारे ट्रॉफी जिंकली. २१ वर्षीय पृथ्वी हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप व विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा पहिलाच खेळाडू आहे. ( Prithvi Shaw becomes the first captain to win both U-19 World Cup and Vijay Hazare Trophy )

पृथ्वीनं उपांत्यापूर्व फेरीत सौराष्ट्र विरुद्धच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो.

पृथ्वी शॉ याच्या यशानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या कॅपवर Virat Kohli असे लिहिलेलं दिसत आहेत. त्यामुळे आता पृथ्वीच्या या यशाचं रहस्य त्या नावात आहे, असा तर्क लावला जात आहे.