क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्या 14 बेस्ट रोमँटिक स्टोरी!

मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर - बॉलिवूडचा एक काळ शर्माला टागोर यांनी गाजवला आणि तेव्हाच भारतीय संघाचे कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी क्रिकेटमध्ये आपला दबदबा गाजवला होता. ही केवळ बॉलिवूड आणि क्रिकेट यांचा मिलाप नव्हता, तर दोन धर्मही एकत्र आली होती. शर्मीला या हिंदू होत्या, तर मन्सूर अली खान पतौडी मुसलमान. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केला आणि हे लग्न फार काळ टिकणार नाही, असाही अनेकांनी दावा केला. पण, या जोडीनं सर्वांना चुकीचं ठरवलं.

हेझल किच आणि युवराज सिंग - भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराजचं नाव दीपिका पादुकोन आणि किम शर्मा यांच्याशी जोडलं केलं. पण, युवीनं हेझल किचशी विवाह करून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. 30 नोव्हेंबर 2016मध्ये युवी व हेझलनं चंदीगड येथे विवाह केला.

सागरिका घाटगे आणि झहीर खान - चक दे इंडिया पाहून भारताचा गोलंदाज झहीर खान सागरिकाच्या प्रेमातच पडला. युवी आणि हेझलच्या लग्नात झहीर-सागरिकाला एकत्र पाहिले गेले होते. 23 नोव्हेंबर 2017मध्ये या दोघांनी लग्न केलं.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली - भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असलेली जोडी. 2014मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. 11 डिसेंबर 2017मध्ये दोघांनी इटलीत लग्न केलं.

गीता बसरा आणि हरभजन सिंग - 29 ऑक्टोबर 2015मध्ये या जोडीनं मैत्रीचं रुपांतर एका नात्यात केलं. वर्षभरात या दोघांच्या घरी पाळणा हलला. त्यांच्या मुलीचं नाव हिनाया हीर प्लाहा असं आहे.

संगिता बिजलानी आणि मोहम्मद अझरुद्दीन - मोहम्मद अझरुद्दीननं पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संगिता बिजलानीशी विवाह केला. पण, 14 वर्षांनंतर या जोडीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

किम शर्मा आणि युवराज सिंग - हेझल किचपूर्वी युवराज सिंगचं नाव किम शर्माशी जोडलं गेलं. पण, हे नातं फार टिकलं नाही.

इशा शर्वानी आणि झहीर खान - झहीर आणि इशा यांचं नातं 8 वर्ष होतं आणि ही दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. पण, तसं झालं नाही.

नगमा आणि सौरव गांगुली - भारताचा अँग्री कर्णधार म्हणून गांगुली ओळखला जातो. भारतीय क्रिकेटला त्यानं एका वेगळ्या उंचिवर नेऊन ठेवलं. त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नगमा यांच्याही प्रेमाच्या चर्चा रंगल्या होता. पण, या चर्चांचं त्याच्या खेळावर परिणाम होत होता आणि त्यामुळे त्यानं हे नातं संपुष्टात आणलं.

अम्रिता सिंग आणि रवी शास्त्री - रवी शास्त्री त्यांच्या काळातील पोस्टर बॉय होते. तेव्हा त्यांच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री अम्रिता सिंग यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. पण, या दोघांनी सामंजस्यानं नातं सपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

जीनत अमान आणि इम्रान खान - पाकिस्तानचा चॉकलेट बॉय इम्रान खान आणि बॉलिवूडची अभिनेत्री जीनत अमान यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. पण, हेही नातं फार टीकलं नाही.

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स - एक अधुरी कहाणी.... नीना आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्ह रिचर्ड्स यांचं प्रेमप्रकरण त्या काळात गाजलं होतं. या दोघांना मसाबा ही मुलगी आहे, परंतु या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

रीना रॉय आणि मोहसीन खान - रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान याच्याशी लग्न केलं. त्यासाठी रीन रॉय यांनी आपलं करिअर सोडलं. पण, काही काळानंतर त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या. घटस्फोटानंतर मोहसीननं दुसरं लग्न केलं.

अंजू महेंद्रू आणि गॅरी सोबर्स - 60च्या दशकात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना या दोघांची भेट झाली. पण, अंजूच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं.

Read in English