बांगलादेशचा संघ भारतात दाखल

ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले आहे. आफ्रिकेनंतर आता टीम इंडिया बांगलादेश संघाशी भिडणार आहे.

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी-20 व दोन कसोटी सामने खेळणार आहेत.

यासाठी बांगलादेशाचा संघ भारतात दाखल झाला आहे. बांगलादेशसोबत 3 नोव्हेंबरला पहिला ट्वेंटी-20 सामना दिल्लीत होणार आहे.

दुसरा ट्वेंटी-20 सामना 7 नोव्हेंबरला राजकोटला होणार आहे. त्यानंतर तिसरा ट्वेंटी-20 सामना 10 नोब्हेंबरला नागपूरमध्ये होणार आहे.

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघात शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम या खेळाडूंचा समावेश आहे.

या ट्वेंटी-20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे, तर कोहली कसोटी मालिकेपर्यंत विश्रांती घेणार आहे.

तसेच, या ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅम्सन आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.