Yes बँक, No कॅश... बँकेबाहेर रांगाच रांगा, ग्राहकांच्या डोळ्यात आसू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:27 AM2020-03-07T11:27:19+5:302020-03-07T11:40:17+5:30

We would like to inform you that our ATMs are now functional. You can locate the ATM nearest to you here: yes bank tweet for consumer

येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक निर्बंध लागू केल्यानंतर आपल्या ठेवींचे काय होणार, याची चिंता ग्राहकांना लागली आहे

येस बँकेवर निर्बंध लागू झाल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिनाभरात ५० हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच कोणतेही कर्ज देता येणार नाही

कोणत्याही प्रकारची अदायगी बँकेला करता येणार नाही. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे.

दिवसभर देशातील बँकेच्या १,१२२ शाखांमध्ये ग्राहकांचे दूरध्वनी खणखणत होते. त्यातच बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमल्यामुळे आपल्या ठेवींचे काय होणार ही चिंता व्यक्ती होत होती.

येस बँकेचे मुख्यालय मुंबईत असून बँकेने आपला पूर्वीचा १८००२००० हा टोलफ्री नंबर बदलून आता १८००१२०० केला आहे. बँक आर्थिक संकटात सापडल्याचे व पैसे काढण्यावर बंधने आल्याचे संदेश समाजमाध्यमांवर फिरू लागले आहेत.

भारतीय स्टेट बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेला वाचवण्यासाठी तिच्यातील काही हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे

शुक्रवारी येस बँकेच्या समभागांवर विक्रीचा दबाव प्रचंड प्रमाणावर वाढला. त्यामुळे दिवसभरात हा समभाग मुंबई शेअर बाजारात ५६.०४ टक्के कोसळला आणि १६.२० रुपये किंमतीवर बंद झाला

येस बँकेच्या व्यवहारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आपले पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत.

बँकेचे एटीएम मशिन्सही बंद झाले असून पेटीएमवरुनही बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्राहकांमध्ये बँक आणि सरकारबद्दल प्रचंड रोष निर्माण झालाय

बँकेवर निर्बंधन लादल्यानंतर बँकेबाहेर सुरक्षाही वाढविण्यात आली आहे, ग्राहकांनी सोशल मीडियावरुनही संताप व्यक्त केला आहे.

कुणाला उपचारासाठी पैसे हवेत, कुणाला लग्नासाठी हवेत, त्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. पण, बँक पैसेच देत नाही

येस बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहक त्रस्त झाले असून काम-धंदे सोडून थेट बँकेतच जात आहेत.

बँकेच्या ग्राहकांच्या रोषाचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे, त्यात हिंसात्मक घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

अनेकांनी रडून आपलं दु:ख व्यक्त केलंय, तर अद्यापही संताप व्यक्त होत आहे.

बँकेच्या ठेवीदारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिलासा दिला. ठेवीदारांचे सर्व पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही देतानाच याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

सरकारकडून केवळ अपेक्षा ठेवण्यापलिकडे आता ग्राहकांकडे काहीच उरले नाही, तर किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न या ग्राहकांना पडलाय