pm kisan maan dhan scheme for farmers to get per month pension 3000 rs and per year 36000 rs
सरकारची 'ही' योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळातील बनली आधार, वर्षाला मिळणार 36000 रुपये... By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:53 PM2021-01-13T12:53:12+5:302021-01-13T13:07:25+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. लाखो शेतकर्यांना याचा थेट फायदा होत आहे. यापैकी एक योजना म्हणजे सरकारची पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme). या योजनेंतर्गत सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसारखे शेतक्यांना दरमहा पेन्शन मिळते. पंतप्रधान किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 व्या वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकेल. हा पेन्शन फंड भारतीय आयुर्विमा महामंडळाडे (एलआयसी) सोपविण्यात आला आहे. या योजनेत वयानुसार महिन्याला पैसे भरल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर महिन्याला 3000 किंवा वर्षाला 36000 रुपये पेन्शन दिली जाते. यासाठी मासिक देय 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे. आतापर्यंत 21 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झाले आहेत. शेतकरी पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भाग घेऊ शकतात. ज्यांच्याजवळ जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन असलेले शेतकरी पेन्शन योजनेत भाग घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे मासिक सुमारे 55 ते 200 रुपयांपर्यंत देय द्यावे लागेल. या योजनेंतर्गत शेतकर्याचे योगदान सरकारने दिलेल्या योगदाना इतकेच असेल. म्हणजेच पीएम किसान खात्यात आपले देय 55 रुपये असेल तर सरकार सुद्धा तुमच्या खात्यात 55 रुपयांचे देय देईल. देय शेतकऱ्यांच्या वयावर आधारित असते. उदाहरणार्थ, जर 18 व्या वर्षी योजनेत सहभाग घेतल्यास देय 55 रुपये किंवा वर्षाला 660 रुपये असते. तसेच, जर 40 व्या वर्षी योजनेत सहभाग घेतल्यास महिन्याला 200 रुपये किंवा वर्षाला 2400 रुपये देय भरावे लागेल. या योजनेसाठी, शेतकर्याला जवळच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन त्याची नोंदणी करून घ्यावी लागेल. यासाठी आधार कार्ड आणि खसरा खटियानची प्रत घ्यावी लागेल. यासह, शेतकऱ्याचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँक पासबुक देखील आवश्यक असेल. नोंदणीदरम्यान, शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिले जाईल. यासाठी स्वतंत्र फी नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला योजना मध्येच सोडायची असेल तर तो त्याचे पैसे गमावणार नाही. योजनेतून बाहेर पडेपर्यंत जमा झालेल्या पैशांवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळते.टॅग्स :शेतीव्यवसायagriculturebusiness