काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:18 PM2021-02-20T14:18:30+5:302021-02-20T14:25:40+5:30

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते.

काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात.

विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.

हे सगळं होत असताना अनेकांना करणसिंहने त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी काडीमोड का घेतला आणि बिपाशाशी लग्न का केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

त्याने असं का केलं असा प्रश्न आजही अनेकांना पडतो.

यावरून अनेक चर्चाही ऐकायला मिळतात. मात्र यावर इतके दिवस मौन बाळगणाऱ्या करणने पहिल्यांदाच आपलं मौन सोडले होते.

‘बेहद’फेम अभिनेत्री जेनिफर विंगेटने यावर काही बोलण्याआधी करणने भूमिका मांडली होती.

जेनिफरशी लग्न करणं ही आपली घोडचूक होती असं करणने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात. त्यांचा जीवनसाथी म्हणून विचार होऊ नये असं सांगत जेनिफरशी केलेल्या लग्नाबाबत त्यानं पश्चाताप व्यक्त केला होता.

घाईघाईत निर्णय घेऊन आपण चूक केली होती, मात्र भविष्यात त्याची पुनरावृत्ती करणार नाही असंही तो या मुलाखतीत म्हणाला होता.

"करण आणि माझे कॉम्बिनेशन खूप चांगले जमले आहे. आमच्या चांगली मैत्रीसुद्धा झाली आहे. शूटिंगवेळी आम्ही दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. तो खूप मेहनती आणि चांगला अभिनेता आहे."

दोघांच्या आवडी-निवडी जुळल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.