OMG! नूतन यांनी चारचौघात मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 08:00 AM2020-06-07T08:00:00+5:302020-06-07T08:00:02+5:30

नूतन यांनी खूपच कमी वयात बॉलिवूडमधील त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी केवळ वयाच्या १४ व्या वर्षी हमारी बेटी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमधील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

नूतन यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

नूतन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मातब्बर अभिनेत्यांसोबत काम केले. संजीव कुमार यांच्यासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये त्यांची जोडी जमली. संजीव आणि नूतन हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स होते. पण तरीही नूतन यांनी रागाच्या भरात संजीव यांच्या कानाखाली मारली होती.

नूतन आणि संजीव कुमार यांच्या अफेअरची चर्चा त्या काळात मीडियात चांगलीच रंगली होती आणि या चर्चांमुळे नुतन यांच्या घरात देखील भांडणं सुरू झाली होती.

संजीव कुमार यांना मीडियाच्या काही प्रतिनिधींशी बोलताना नूतन यांनी एकदा पाहिले होते. त्यामुळे संजीवच या अफवा पसरवत असल्याचा त्यांचा गैरसमज झाला होता. नूतन यांचे लग्न लेफ्टनंट नेव्ही कमांडर रजनीश बहल यांच्यासोबत झाले होते.

अभिनेता मोहनिश बहल हा नूतन यांचा मुलगा असून त्याने देखील आपल्या आईप्रमाणेच बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

नूतन या चित्रपटसृष्टीचा अनेक वर्षं भाग असल्या तरी त्यांनी स्वतःला कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर ठेवणेच पसंत केले.

नूतन या अभिनेत्री तनुजा यांच्या बहीण असून अभिनेत्री काजोल त्यांची भाची आहे.

नूतन यांचे निधन १९९१ मध्ये कॅन्सरने झाले तर त्यांच्या निधनानंतर काही वर्षांनी म्हणजेच २००४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.

टॅग्स :नुतनNutan