या कारणामुळे मनीषा कोईरालाचा झाला घटस्फोट, त्यानंतर कधीच लग्न न करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:10 PM2021-03-15T19:10:11+5:302021-03-15T19:14:59+5:30

Manisha Koirala ends marriage after 2 years :अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये मनिषा कोईरालाही गणली जाते.

19 जून 2010 साली नेपाळी उद्योजक सम्राट दहल यांच्याशी मनिषा रेशीमगाठीत अडकली होती.

मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

लग्नानंतर थोड्याच काळात मनीषा आणि तिच्या नव-यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खटके उडू लागले.

शेवटी दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की, मनिषाने त्याला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

तिच्या या घटस्फोटोला मनिषा स्वतःलाच जबाबदार मानते.

मुळात लग्न करण्याचा निर्णय तिने घाईत घेतल्याचे सांगितले होते.

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आनंदीच राहू शकत नाही त्या नात्यातून बाहेर पडणेच चांगले असे तिने सांगितले होते.

घटस्फोट घेतल्यानंतर मनिषाला कर्करोग झाला, त्यानंतर तिने यावर उपचार घेतले आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.

या लग्नानंतर मनिषाने पुन्हा लग्न करण्याचा विचारदेखील केला नाही.

तिच्या तुटलेल्या लग्नाचा आजही तिला पश्चाताप असल्याचे ती सांगते.