In Pics: बॉलिवूडचे रिअल लाइफ लव्ह ट्रँगल्स, या अफेअरची खूप झाली चर्चा

By रूपाली मुधोळकर | Published: September 22, 2020 05:37 PM2020-09-22T17:37:08+5:302020-09-22T17:50:43+5:30

लव्ह, ब्रेकअप, पॅचअप हे बॉलिवूडसाठी नवे नाही. आज आम्ही बॉलिवूडमधील काही रिअल लव्ह ट्रँगलबद्दल सांगणार आहोत.

अमिताभ बच्चन व रेखा यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘दो अनजाने’च्या सेटवर अमिताभ व रेखा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ‘सिलसिला’ या सिनेमापर्यंत दोघांचे नाते कायमचे संपुष्टात आले. अमिताभ यांनी जयासोबत लग्नगाठ बांधली.

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण एकेकाळचे चर्चित कपल. हे प्रेम बहरात असताना रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एन्ट्री झाली. कॅटसाठी रणबीरने मला धोका दिला होता, असा दावा खुद्द दीपिकाने एका मुलाखतीत केला होता. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यावर दीपिकाने रणवीर सिंगशी लग्न केले तर रणबीर सध्या आलिया भटला डेट करतोय.

शाहिद कपूर व करिना कपूरचे अफेअर आजही चर्चेत असते. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिनाने सैफ अली खानशी लग्नगाठ बांधली. तर शाहिदनेही मीरा राजपूतला जोडीदार निवडले.

लव्ह स्टोरी 2050 या सिनेमाच्या सेटवर प्रियंका चोप्रा अभिनेता हरमन बावेजाच्या प्रेमात पडली होती. पण हा सिनेमा फ्लॉप झाला आणि सोबत हरमन व पीसीची लव्हस्टोरीही फसली. यानंतर ‘कमीने’च्या सेटवर प्रियंका शाहिद कपूरवर भाळली होती.

हृतिक रोशनचे सुजैन खानसोबत लग्न केले. संसार सुरळीत सुरु असताना ‘काइट्स’ या सिनेमाच्या सेटवर हृतिक बार्बरा मोरीच्या प्रेमात कैद झाला होता. त्यावेळी या अफेअरच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या.

अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणास्तव हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. यानंतर करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली तर अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत संसार थाटला.

ऐश्वर्या राय व सलमान खान यांचे अफेअर म्हणजे बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चित अफेअर. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोले गेले होते. अर्थात हे नातेही फार काळ टिकले नाही.

बिपाशा बासूने कधीच आपले रिलेशनशिप जगापासून लपवले नाही. डीनो मोरियासोबत ती दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. डिनोसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेक वर्ष तिने जॉन अब्राहमला डेट केले होते.

अक्षय कुमार व शिल्पा शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होतात. हाच अक्षय रवीना टंडनसोबतही रिलेशनशिपमध्ये होता.

1980 च्या दशकात श्रीदेवी व मिथुन यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे मिथुन आधीच विवाहित होते. मिथुन पत्नी योगिता बाली यांना कधीच सोडू शकत नाही, हे लक्षात आल्यावर श्रीदेवीने मिथुनपासून दूर जाणे पसंत केले होते.

मोना शौरी व बोनी कपूर यांचा संसार सुखात सुरु असताना बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवीची एन्ट्री झाली होती. मोनाला पतीच्या या नात्याबद्दल कळले तेव्हा श्रीदेवी गर्भवती होती. श्रीदेवीसाठी बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट दिला होता.

शत्रुघ्न सिन्हा व रिना रॉय एकेकाळचे चर्चित कपल होते. पूनम चंदिरामानीसोबत लग्न झाल्यानंतरही रीना शत्रुघ्नला सोडायला तयार नव्हती. शत्रुघ्नच्या प्रेमात रिना जणू वेडी झाली होती.

प्रकाश कौर ही पत्नी असताना आणि दोन मुले असताना धर्मेन्द्र हेमा मालिनीच्या प्रेमात गुंतले. पुढे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच धर्मेन्द्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्नगाठ बांधली.