अरेच्चा, लग्नानंतर पत्रलेखाकडून झाली मोठी चूक, युझर्सनेच निदर्शनास आणून दिली गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:25 AM2021-11-20T11:25:58+5:302021-11-20T11:45:28+5:30

नुकतेच लग्नबंधनात अडकलेले राजुकमार राव आणि पत्रलेखा सध्या चर्चेत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी दोघेही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.

गेल्या ११ वर्षांपासून अफेअर सुरु होते.मात्र त्यांच्या या नात्याची त्यांनी कधीच जाहीरपणे कबुली दिली नव्हती.

त्यांच्या नात्याची कानोकान कोणाला त्यांनी खबर लागू दिली नाही. लग्न ठरल्यानंतर त्यांनी थेट लग्न करत असल्याचे सांगत चाहत्यांना धक्काच दिला होता.

लग्नानंतर दोघेही नवदाम्पत्य एअरपोर्टवर स्पॉट झाले. दोघेही दिसतातच मीडियाचे कॅमेऱ्यात कैद झाले. दोघांनी एकसे बढकर एक पोज दिल्या.

यावेळी पत्रलेखाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. लाल साडीमध्ये पत्रलेखाचे सौंदर्य आणखी खुलून आले होते.

या दोघांचे फोटो समोर येताच सगळ्यांची नजर पत्रलेखाच्या मंगळसुत्रावर पडली. सध्या मंगळसुत्रावरच जास्त चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी एका गोष्टीवर सध्या नेटीझन्स सोशल मीडियावर चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पत्रलेखाने परिधान केलेल्या साडीवर किंमत असल्याचा टॅग तसाच होता.

पत्रलेखा हा टॅग काढायला बहुदा विसरली असावी, टॅग न काढताच तिने साडी परिधान केली असावी.

फोटो समोर येताच नेटीझन्सचे टॅगवरच लक्ष गेले आणि त्यांनीच पत्रलेखाची चुक निदर्शनास आणून दिली.