IN PICS : ऐश्वर्या ते करिना...! सिनेमाच्या रिलीजआधी या 10 कलाकारांचा झाला पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:02 PM2021-04-23T19:02:09+5:302021-04-23T19:21:35+5:30

काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना 2’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण बॉलिवूडची दुनियाच अशी आहे. कुणाचे नाणे कधी खोटे ठरेल सांगता यायचे नाही.

कार्तिक व करण जोहर यांच्यात अलीकडे मोठा वाद झाला. याच वादामुळे करणने कार्तिकची ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी केली. कार्तिकने 20 दिवसांचे शूटींग केले होते. मात्र तरीही कोट्यवधी रूपयांचे नुकसान सहन करून करणने त्याची हकालपट्टी केली. अर्थात हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधीही अनेकदा असे झाले आहे.

अनेक वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायलाही एका सिनेमातून असेच काढून टाकण्यात आले होते. सिनेमाचे नाव होते चलते-चलते. सलमान खानने सेटवर जाऊन गोंधळ घातला आणि त्याची शिक्षा ऐश्वर्याला झाली. तिच्या जागी मग या सिनेमात राणी मुखर्जीला घेतले गेले.

करिना कपूर हिला संजय लीला भन्साळींनी ‘रामलीला-गोलियों की रासलीला’ या सिनेमातून ऐनवेळी रिप्लेस केले होते. करिनाचा या सिनेमाचा फर्स्ट लूकही आऊट झाला होता. पण करिनाचे लग्न आणि डेट्सच्या वादामुळे भन्साळींनी करिनाला सिनेमातून बाद केले. यानंतर ही भूमिका दीपिका पादुकोणने साकारली.

मणिकर्णिका या सिनेमातून अभिनेता सोनू सूदला असेच बाहेर करण्यात आले होते. त्याने सिनेमाचे बहुतांश शूटींग पूर्ण केले होते. मात्र कंगनासोबत कशावरून तरी वाजले आणि अचानक सोनू सूदचा पत्ता कटला.

कतरिना कैफ हिलाही करिअरच्या सुरूवातीला रिप्लेटमेंट झेलावी लागली होती. अनुराग बासूच्या साया या सिनेमाचे एका दिवसाचे शूटींग तिने केले होते. मात्र नंतर अचानक तिला काढून या सिनेमात तारा शर्माला घेण्यात आले होते.

रेखा यांनाही फितूर या सिनेमात रिप्लेस करण्यात आले होते. काही दिवसांचे शूटींग केल्यानंतर त्यांना या सिनेमातून बाद करण्यात आले. यानंतर ही भूमिका तब्बूने साकारली होती.

श्रद्धा कपूर हिने सायना नेहवालच्या बायोपिकसाठी कसून तयारी केली होती. मात्र तरीही तिला हा सिनेमा सोडावा लागला. तिच्यावर सायना खूश नव्हती, असे म्हणतात. यानंतर परिणीतीची या सिनेमात वर्णी लागली.

चित्रांगदा सिंग हिला बाबू मोशाय या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यानंतर तिच्या जागी बिदिता बाग हिची वर्णी लागली होती.

वरूण धवनने अगदी धुमधडाक्यात ‘मिस्टर लेले’ची घोषणा केली होती. याचे अतरंगी पोस्टरही रिलीज झाले होते. पण म्हणतात की, क्रिएटीव्ह मतभेदांमुळे वरूणने हा सिनेमा करण्यास नकार दिला. सध्या विकी कौशल हा सिनेमा करतोय.

मनमर्जिया या सिनेमातून आयुष्यमान खुराणा व भूमी पेडणेकर दोघांनाही ऐनवेळी रिप्लेस करण्यात आले होते. या दोघांनी सिनेमाचे शूटींगही सुरु केले होते. मात्र अनुराग कश्यपची एन्ट्री झाली आणि त्याने सिनेमाची अख्खी कास्टच बदलली.

Read in English