Dhanush-Aishwarya divorce : १८ वर्षाच्या संसारानंतर का तुटलं धनुष-ऐश्वर्याचं नातं? जवळच्या मित्राने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:51 PM2022-01-18T15:51:24+5:302022-01-18T16:05:15+5:30

Dhanush-Aishwarya Rajnikanth divorce Reason : दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण धनुषच्या एका जवळच्या मित्राने 'इंडिया टुडे'ला सांगितलं. हा मित्र म्हणाला की धनुष एक वर्कहॉलिक प्रकारचा व्यक्ती आहे.

Dhanush-Aishwarya Rajnikanth divorce Reason :साऊथचा सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी १८ वर्षांच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एक जॉइंट स्टेटमेंटमधून याची माहिती दिली. फॅन्ससाठी ही धक्कादायक बातमी ठरली. पण दोघांच्या जवळच्या लोकांसाठी ही बाब फार शॉकिंग नव्हती.

दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण धनुषच्या एका जवळच्या मित्राने 'इंडिया टुडे'ला सांगितलं. हा मित्र म्हणाला की धनुष एक वर्कहॉलिक प्रकारचा व्यक्ती आहे. जे त्याला ओळखतात, ते हेच सांगतील की, धनुष कोणत्याही गोष्टीआधी त्याच्या कामाला जास्त महत्व देणं पसंत करतो.

'अनेकदा तर असंही झालं आहे की, जेव्हा धनुष वर्क कमिटमेंट्ससाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतो. आउटडोर शूटींगमुळे परिवारापासून दूर राहतो. कामाच्या प्रेशरची शिक्षा परिवाराला भोगावी लागते. आधीही धनुष आणि ऐश्वर्यात कोणत्या गोष्टीवरून वाद झाला तर धनुष एक नवा सिनेमा साइन करत होता. ज्यात तो स्वत:ला व्यस्त ठेवत होता आणि वादाचा जास्त विचार करत नव्हता'.

'धनुष फार प्रायवेट व्यक्ती आहे. जवळच्या मित्रांसोबतही तो फार काही डिस्कस करत नाही. तुम्ही सांगू शकत नाही की, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे. जेव्हाही धनुष आणि ऐश्वर्यामध्ये काही वाद होत होता तेव्हा नवा सिनेमा साइन करणं धनुषसाठी बेस्ट मार्ग होता. एका फेल झालेल्या रिलेशनशिपमधून निघण्यासाठी धनुष काम करण्याचा मार्ग निवडत होता'.

'याने परिवारावर फार खोलवर प्रभाव पडला. गेले सहा महिने कपलसाठी फारच अडचणीचे गेले. धनुषने ओटीटी स्पेससोबत प्रॉडक्शन आणि नव्या प्रोजेक्ट्सच्या प्लानिंगमध्ये स्वत:ला बिझी ठेवलं. यामुळे धनुष आणि ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळे होण्याचा विचार खूपआधीपासून सुरू होता'.

सूत्रांनी असंही सांगितलं की, जॉइंट स्टेटमेंट जारी करण्याआधी धनुष आणि ऐश्वर्याने बराच वेळ बोलणी केली. धनुषला कोणत्याही प्रकारचं ऑफिशिअल स्टेटमेंट जारी करण्याआधी 'अतरंगी रे'चं प्रमोशन पूर्ण करायचं होतं. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान धनुष आपल्या एलीमेंटमध्ये नव्हता.

'त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की, तो पर्सनली लॉसमधून जात आहे. तेच ऐश्वर्याने स्वत:ला बिझी ठेवण्यासाठी फिटनेस, चॅरिटी आणि वुमन इम्पॉवरमेंटचा मार्ग निवडला. ती दोन्ही मुलं यात्रा आणि लिंगावर पूर्णपणे लक्ष देत होती'.

'दोन्ही मुलं आता मोठे झाले आहेत, त्यामुळे धनुष आणि ऐश्वर्या दोन्ही मुलांना त्यांचं वेगळं होण्याचं कारण समजावून सांगण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या काही वर्षापासून धनुष आणि ऐश्वर्या आपल्या पर्सनल स्पेसवर जास्त लक्ष देण्याच्या प्रयत्नात होते. ज्याचं कारण त्यांचं नातं तुटलं'.

'दोघेही एकटे राहून आपल्या आनंदाबाबत विचार करत होते. दोघांसाठीही मुलं पहिली प्रायोरिटी होती. दोघांचाही को-पॅरेंटींगमध्ये विश्वास आहे. दोघे एकमेकांचा राग करत नाहीत. पुढे जाऊन ते मुलांसाठी पब्लिक स्पेस आणि इव्हेंट्समध्ये दिसू शकतात'.