IN PICS : याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा..., पण बॉलिवूड कलाकार या गोष्टी नेमानं पाळतात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:00 AM2022-01-06T08:00:00+5:302022-01-06T08:00:14+5:30

Bollywood : नशिबावर भरवणारा ठेवणारे लोक यश व आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टी करतात. विशिष्ट राशीची अंगठी, दागिने, धागेदोरे असं वेगवेगळ्या गोष्टी परिधान करतात. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत....

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन बोटात नीलम असलेली अंगठी घालतात. ही अंगठी घातल्यानंतर आपलं नशीब फळफळलं, असं ते मानतात. बिग बी क्रिकेटचे फॅन आहे. पण ते कधीही थेट सामना बघत नाहीत, विशेषत: भारताची मॅच. आपण सामना पाहिला तर जिंकत आलेला भारताच्या सामना गमावतो, असा त्यांचा समज आहे.

बॉलिवूडचा किंगचान शाहरुख खानचा 555 क्रमांकावर खूप विश्वास आहे. त्यांच्या सर्व वाहनांच्या नंबरप्लेट पाहून तुम्हीही यावर विश्वास ठेवाल. ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या पोस्टरसाठी त्याने जी बाईक चालवली होती त्या नंबर प्लेटवर सुद्धा 555 नंबर होता.

सलमान खानचा लकी चार्म म्हणजे त्याचं ब्रेसलेट. या ब्रेसलेटमध्ये फिरोजा स्टोन आहे. जेव्हा कोणतीही निगेटीव्ह एनर्जी तुमच्याकडे येते तेव्हा हा स्टोन ती निगेटीव्ह एनर्जी आपल्याकडे खेचून घेतो. यानंतर या स्टोनमध्ये अक्षरश: शिरा तयार होतात आणि त्याला तडे जातात, असा सलमानचा अनुभव आहे. या कारणाने त्याने सात वेळा हा स्टोन बदलला.

काजोलचा तिचा पती अजय देवगणने एक हि-याची अंगठी गिफ्ट दिली होती. हि-याने जडलेल्या ओम डिझाईनच्या या अंगठीवर काजोलचा खूप विश्वास आहे. यामुळे तिला नेहमी शांत राहण्यास मदत होते, असं ती मानते.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं भलतंच वेगळं गणित आहे. अक्षयचा सिनेमा रिलीज होणार असला की तो बहुतेकदा विदेशात असतो. असं केलं की सिनेमा चालतो, असं त्याला वाटतं.

रणवीर सिंगने त्याच्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधला आहे. रणवीर वारंवार आजारी पडत असल्याने त्याच्या आईने त्याच्या पायात हा धागा बांधल्याचं कळतं. हा धागा बांधल्यापासून त्याची आजारांपासून सुटका झाली असं रणवीरला वाटतं.

दीपिका पादुकोण सिद्धिविनायकाला खूप मानते. चित्रपटांच्या रिलीजआधी ती सिद्धिविनायकाचे दर्शन घेते. लग्नानंतरही सर्वात आधी दीपिका व रणवीर सिंग यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं.

शिल्पा शेट्टी उजव्या हाताच्या बोटात पाचूची अंगठी घालते. या अंगठीमुळे करिअरला गती मिळाली, असं ती मानते. याशिवाय शिल्पा शेट्टीची टीम राजस्थान रॉयल्स मैदानात क्रिकेट खेळत असते, तेव्हा ती नेहमी दोन घड्याळे घालते. इतकंच नाही जेव्हा विरोधी संघ फलंदाजी करतो, तेव्हा ती म्हणे, तिचे पाय पसरून बसते तर तिचा संघ खेळायला लागला की पाय आखडून बसते.

विद्या बालन या काजळ लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. हे काजळ डोळ्याचं सौंदर्य वाढावं म्हणून नाही तर कुणाचीही दृष्ट लागू नये, हा तिचा उद्देश. काजळ दृष्ट शक्तींपासून वाचवते, यावर तिला गाढ विश्वास आहे.

‘नमस्ते लंडन’ या सिनेमाच्या रिलीजआधी कतरिना कैफ अजमेर शरीफच्या दर्गा मध्ये गेली होती, जिथे तिच्या कपड्यावरून मोठं मॅटर झालं होतं. परंतु सिनेमाने चांगला बिजनेस केला होता. तेव्हापासून कतरिना आपल्या प्रत्येक फिल्मया रिलीज च्या आधी अजमेर शरीफला न चुकता जाते.