लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:36 PM2021-05-10T15:36:12+5:302021-05-10T16:13:36+5:30

तिने त्याला पाहिले पहिल्यांदा आणि पहिल्याच नजरेत त्यानं तिला क्लीनबोल्ड केलं. बघताच क्षणी त्याच्या ती प्रेमातच पडली. तो तिच्या आयुष्यात येताच तिचं आयुष्यच जणू पालटलं. ही सगळी गोष्ट आहे ती अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची.

काजोल आणि अजय देवगण हे इंडस्ट्रीतील सर्वात क्युट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते. २५ वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या काजोल आणि अजय देवगण यांची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.

विशेष म्हणजे अजयला पाहताक्षणी काजोलला तो आवडला होता. काजोलला अजयचा साधेपणा भावला. लाइफ पार्टनर म्हणून अजयशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही असेही तिला वाटले होते.

पाच वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले या पाच वर्षात दोघांचं प्रेम खुलू लागलं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे अजय हा शांत स्वभावाचा आणि काजोल मात्र बोलकी स्वभावाची असल्यामुळे दोघांच्या स्वभाव जुळतील का यामुळे ही जोडी परफेक्ट वाटत नव्हती.

२५ वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. दोघेही मेड फॉर इच अदर कपल असल्याचे दोघांनीही आज सिद्ध करुन दाखवले आहे.विशेष म्हणजे काजोलचे अजयवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे त्याच्यापेक्षा फार काळ लांब राहणे तिला अजिबात शक्य नव्हते.

त्यामुळे करिअरच्या यश शिखरावर असतानाही काजोलने करिअरपेक्षा प्रेमाला महत्त्व दिले आणि अजयसोबत लग्न करत संसार थाटला. लग्न केले तेव्हा काजोलकडे पाच सिनेमांच्या ऑफर्स होत्या.

लग्नानंतरही तिला काम मिळत गेले. लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपते असे म्हणणा-यांसाठी काजोल उत्तम उदाहरण आहे. आज या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी त्यांची नावं आहेत.

बिझी शेड्यूअलमधून अजय देवगण वेळ काढून कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो.

अजय देवगण याने बॉलिवूडवर गेल्या तीस वर्षापासून अधिराज्य गाजवले आहे. काजोल आणि अजय दोघांची जोडी सिनेमांमध्येही रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती.

हलचल, होगी प्यार की जीत, इश्क यासारखे सिनेमे हिट ठरले इतकेच काय तर 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या सिनेमातही या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली.