'या' पाच राशींचे लोक असतात जमदग्नीचे अवतार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 03:16 PM2021-04-29T15:16:49+5:302021-04-29T15:23:21+5:30

रागावर नियंत्रण मिळवणे ही सर्वात मोठी कला आहे. तेही विशेषतः आजच्या घडीला. जेव्हा सर्वांचा संयमाचा ताबा सुटलेला आहे. ज्याला त्याला आपलेच म्हणणे खरे करण्याची घाई लागलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग, भांडणं, चिडचिड करणे, ही नित्याची बाब बनत चाललेली आहे. भयंकर राग येणाऱ्या लोकांना जमदग्नी ऋषींची उपमा दिली जाते. अशातच बारा राशींपैकी पाच राशी अशा आहेत, जे रागाच्या बाबतीत अगदी जमदग्नीचा अवतारअसतात. ज्याला आपण शीघ्रकोपी असे म्हणतो. या लोकांना मानवी बॉंब म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या पाच राशीच्या लोकांपासून जरा सावधच राहा!

फट म्हणता ब्रह्महत्या असा यांचा स्वभाव असतो. ते कोणाचेही ऐकून घेत नाहीत आणि आपणच वादाला तोंड फोडतात. राग राग, चिडचिड करून झाली की आपणच शांत होतात. पण रागाची परिस्थिती हाताळणे हे काम त्यांच्या आणि इतरांच्या हाताबाहेरचे असते. म्हणून यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी आपणहून माघार घेणे शहाणपणाचे ठरते.

राशीच्या नावातच गुरगुरण्याचा स्वभाव आहे. रागाच्या भरात ते समोरच्याला फाडून खातील.आपले शब्द मागे घेणे यांना माहीतच नाही. चूक त्यांची असली, तरी ते आपलेच घोडे पुढे दामटवत असतात. रागाच्या भरात वाट्टेल ते बोलतात. आपल्या पेक्षा वयाने आणि हुद्द्याने कमी असलेल्या लोकांवर अधिकार गाजवतात. अनेकदा ते सूचक भाष्यही करून जातात. ज्यामुळे त्यांची पोटातली गोष्ट ओठावर येते.

या राशीचे लोक रागवतात खूप, पण राग व्यक्त करत नाहीत आणि विसरतही नाहीत. तो राग आपल्या मनात दीर्घकाळ ठेवतात. वेळप्रसंगी समोरच्यावर वचपा काढतात. त्यांना जे हवे ते प्राप्त करतात. काहीही चुकीचे झाले की यांचा राग आकाश पाताळ एक करतो. वरचेवर राग व्यक्त करत नसले, तरी जेव्हा करतात तेव्हा समोरच्याची धडगत राहत नाही. रागाच्या भरात ते आपल्या प्रिय व्यक्तीचा पाणउतारा करायलाही मागे हटत नाहीत

ही अग्नी तत्त्वाची रास आहे. रागाच्या भरात ते स्वतः सकट सर्वांचा विनाश करू शकतात. परंतु त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे, की त्यांना शांत झाल्यावर आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपली चूक मान्यदेखील करतात. म्हणून त्यांच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वादविवाद टाळावा आणि शांत झाल्यावर नीट समजूत काढावी!

या राशीचे लोक रागात सगळे काही गमावून बसतात. राग ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. दुसऱ्यावर रागवल्याचा त्रास त्यांना स्वतःला जास्त होतो. हे लोक काम अतिशय जबाबदारीने करतात. परंतु रागामुळे त्यांच्यात नकारात्मक भावना जास्त असते. ही नकारात्मक ऊर्जा काम करण्यात खर्च झाली, तर त्याचा सकारत्मक परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना बोलून, समजावून सांगितले असता, ते लवकर शांत होतात.