परभणी : महिन्यातून दोन वेळाच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:23 AM2019-09-23T00:23:25+5:302019-09-23T00:24:11+5:30

शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.

Parbhani: Water only twice a month | परभणी : महिन्यातून दोन वेळाच पाणी

परभणी : महिन्यातून दोन वेळाच पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुधारले नाही. शहरवासियांना १२ ते १३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १५ दिवसाआड होत आहे. त्यामुळे महिनाभरात केवळ दोन वेळा नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. पाण्याचे रोटेशन अधिक कालावधीचे असल्याने नागरिकांना पावसाळ्यातही पाण्याचा साठा करुन ठेवावा लागत आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजना जुनी असून शहरवासियांना या योजनेद्वारे मुबलक पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणे ही बाब समजण्याजोगी आहे. मात्र पावसाळ्यातही शहरात अनेक भागात १५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात जलवाहिनीला गळती लागली आहे. देशमुख हॉटेल, कारेगावरोड परिसरात नळाद्वारे पाणी आल्यास रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. मात्र गळती दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याचाही अपव्यय होत आहे. मनपाने गळती दुरुस्त करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणाीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Water only twice a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.