परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:46 AM2019-09-21T00:46:11+5:302019-09-21T00:47:43+5:30

औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

Parbhani: The passenger's condition saved the lives of 3 passengers | परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला

परभणी : बसचालकाच्या प्रसंगावधानाने ५७ प्रवाशांचा जीव वाचला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : औरंगाबादहून जिंतूर-येलदरी मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवित प्रयत्नांची पराकाष्टा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाºया सातही आगारामध्ये मोठ्या प्रमाणात नादुरुस्त बस आहेत. असे असतानाही नादुरुस्त बस लांबपल्यासाठी पाठविल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येलदरी येथील अरूंद पुलावर आला. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या धरणावर अरुंद पूल आहे. या पुलावरून औरंगाबादहून जिंंतूर -येलदरी मार्गे रिसोडकडे जाणारी एम.एच. ०६ एस.८९०८ क्रमांकाची बस सायंकाळी ६.३० सुमारास जात असताना अचानक बसचे बाटे तुटले. त्यामुळे ही बस चक्क पुलाकडे घसरत येत असतानाच बसचे चालक विजय पदमाने यांनी प्रसंगावधान राखत घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ ब्रेक लावले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली पडतापडता वाचली. त्यामुळे ५७ प्रवाशांचे जीव वाचले. या बसमध्ये रिसोड, सेनगाव, हिंगोली, वाशिम आदी ठिकाणचे प्रवासी प्रवास करीत होते. आपला जीव वाचल्याने प्रवाशांनी बसच्या खाली उतरून बसचालकाचे आभार मानले.
एका महिन्यात दुसरी घटना
४६ सप्टेंबर रोजी जिंतूर-रिसोड या बसला याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी ६२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक मधुकर घुगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांंचे जीव वाचले होते. त्यातच आता १९ सप्टेंबर रोजी येलदरी येथील याच अरुंद पुलावरून वळण घेताना बसचे पाटे तुटल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
४बसचालक विजय पदमाने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रेक लावून ५७ प्रवाशांचे जीव वाचविले. ही बाब एसटी महामंडळाने गांभीर्याने घेऊन दर्जेदार बस लांब पल्यासाठी वापराव्यात, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.

Web Title: Parbhani: The passenger's condition saved the lives of 3 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.