West Bengal Election 2021: ...तर भाजपाला ५० जागाही मिळाल्या नसत्या; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:15 AM2021-05-03T09:15:36+5:302021-05-03T09:27:20+5:30

निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.

West Bengal Election 2021:West Bengal Chief Minister Mamata Banerjee has leveled serious allegations against the Election Commission | West Bengal Election 2021: ...तर भाजपाला ५० जागाही मिळाल्या नसत्या; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

West Bengal Election 2021: ...तर भाजपाला ५० जागाही मिळाल्या नसत्या; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Next

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. या विजयानंतर बंगालने भारताला वाचविले, अशी मार्मिक प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपाला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  (West Bengal Election 2021)

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. जर निवडणूक आयोगानं भाजपाला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजपा ७० पारही जाणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी मुलाखतीत सांगितलं.

नंदीग्रामच्या लढतीवरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला असून भाजपाला १०० च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आलं आहे. भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस पक्षानं बहुमताचा आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघात पराभव झाला आहे. भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला.

नंदीग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी यांच्यात आघाडी-पिछाडीचा खेळ सुरूच होता. एक वेळ तर ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचीही माहिती समोर आली होती. पण अखेरच्या फेरीनंतर शुभेंदु अधिकारी यांनी १९५६ मतांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी नंदीग्रामच्या लढतीत मुख्यमंत्री ममता दीदी यांना पराभवाचा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read in English

Web Title: West Bengal Election 2021:West Bengal Chief Minister Mamata Banerjee has leveled serious allegations against the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.