मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 05:24 PM2018-06-22T17:24:28+5:302018-06-22T17:36:28+5:30

देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत.

Modi government ministers know nothing about economics says Subramanian Swamy | मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

Next

नवी दिल्ली: मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. 'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी यासंदर्भात भाष्य केले. मुलाखतीच्या सुरुवातीला भाजपा मंत्र्यांवर टीका करणाऱ्या स्वामींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजून घेणारा एकही नेता विरोधी पक्षात नसल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. केवळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असे स्वामींनी सांगितले. मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरुन कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही की नरसिंह राव किंवा मोरारजी देसाईंना. देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. आता उर्वरित वर्षांत ते वेगाने पुढे जातील आणि चांगली कामगिरी करतील. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा विश्वास स्वामींनी व्यक्त केला. भाजपाला लोकसभा निवडणुकीत ३०० च्या आसपास जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले. 

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. राजन हे भारतीय मानसिकतेचे नाहीत. त्यामुळे ते जाणूनबुजून भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करत असल्याचा आरोपही स्वामींनी केला होता. 

Web Title: Modi government ministers know nothing about economics says Subramanian Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.