शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
2
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
3
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
4
नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
5
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
6
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
7
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
8
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
9
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
10
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
11
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
12
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
13
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
14
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
15
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
16
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
17
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
19
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
20
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
Daily Top 2Weekly Top 5

विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:03 IST

या सर्व घटकांमुळे वैमानिकांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली हे कंपनीने मान्य केले.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगोने मागील ७ दिवसांपासून सुरू असलेल्या संकटावर एक सविस्तर रिपोर्ट सरकारला सादर केला. ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या सावळागोंधळामुळे आतापर्यंत ३९०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. ज्यामुळे देशभरात विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. इंडिगोने त्यांच्या उत्तरात या परिस्थितीवर खेद व्यक्त करत प्रवाशांची माफी मागितली आहे. इंडिगोने त्यांचा खुलासा एका पत्राद्वारे सरकारकडे केला आहे. हे पत्र गोपनीय ठेवले आहे.

इंडिगोने पत्रात म्हटलंय की, हे संकट कुठल्या एका कारणामुळे ओढावले नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत आणि अचानक परिस्थिती बिघडली. आमची ऑपरेशनल स्केल खूप मोठी आहे त्यामुळे कोणत्याही एका कारणाला दोष देणे शक्य नाही असं सांगितले. इंडिगोने डीजीसीएला शॉ कॉज नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी काही काळ वेळ मागितला आहे. कारण नियमाप्रमाणे १५ दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो. एअरलाइनने त्यांच्या सुरुवातीच्या तपासात काही कारणे पुढे आल्याचे म्हटलं. त्यात विंटर शेड्युल्ड लागू झाल्यानंतर काही बदल, तांत्रिक बिघाड, खराब वातावरण, एअरस्पेसमध्ये गर्दी आणि एफडीटीएल फेज टू अंतर्गत नव्या पायलट ड्युटी नियमांचा समावेश आहे. इंडिगोने याआधीही डीजीसीएच्या नवीन नियमांवर चिंता व्यक्त केली आणि काही काळात त्यातून सूट द्यावी अशी मागणी केली होती.

या सर्व घटकांमुळे वैमानिकांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली हे कंपनीने मान्य केले. परिणामी त्यांची वेळेवर कामगिरी घसरली. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.  जी क्रू व्यवस्थापन, कर्मचारी नियोजन आणि FDTL नियमांचे पालन तपासेल. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी समितीसमोर हजर राहतील. आम्ही प्रवाशांना वेगाने पूर्ण परतफेड करत आहोत.  आतापर्यंत ₹६१० कोटींपेक्षा जास्त किमतीचे परतफेड प्रक्रिया करण्यात आली आहे असं इंडिगोने सांगितले. 

दरम्यान, ३ ते १५ डिसेंबर या कालावधीत रद्द झालेल्या सर्व विमानांचे तिकिटांचे पैसे रिफंड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची घोषणा कंपनीने सोमवारी केली. या मोठ्या गोंधळामुळे आणि हजारो प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे. या काळात तिकीट बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आता प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इंडिगोने परताव्याची तारीख ४८ तास मागे घेतली आहे. पूर्वी ही घोषणा ५ डिसेंबरपासूनच्या तिकिटांसाठी होती, ती आता ३ डिसेंबरपासून रद्द झालेल्या विमानांना लागू करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo cancels flights: Airline explains reasons to government after disruptions.

Web Summary : Indigo explained to the government that 3900+ flights were cancelled due to winter schedules, technical issues, weather, airspace congestion and pilot duty rules. Passengers will receive refunds; fees are waived for changes/cancellations for affected tickets.
टॅग्स :Indigoइंडिगो