देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:13 AM2020-10-21T08:13:41+5:302020-10-21T08:14:30+5:30

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही.

Every third child in the country is a victim of malnutrition | देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

Next

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : देशात प्रत्येक तिसरे मूल हे कोणत्या ना कोणत्या रूपात कुपोषणाचा बळी ठरले आहे. कुपोषणाचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होत असतो. त्यांचे वजन कमी होते. मात्र, मोदी सरकारच्या राजवटीत तीन वर्षांच्या खालील मुलांच्या कुपोषणात वेगाने घट झाली आहे.

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही. वर्ष २०१६-२०१७ मध्ये कमी वजन व कमी वाढीचे बळी ठरले. मुलांची संख्या कमी होऊन क्रमश: ३३.४ व ३४.७ टक्के राहिली. 

बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासोबत पंतप्रधानांच्या गुजरात राज्यात मुलांच्या कुपोषणाचा स्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात तुलनेत स्थिती काहीशी चांगली आहे; परंतु राज्यातील चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी ३४.१ टक्के वाढ न झालेले व ३०.९ टक्के सामान्यापेक्षा कमी वजनाचे आहेत.
 

Web Title: Every third child in the country is a victim of malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.