CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:48 PM2022-01-16T12:48:02+5:302022-01-16T12:58:17+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली.

CoronaVirus Live Updates covid pandemic cant go on forever will end soon says expert | CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा

Next

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (16 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर आहे. याच दरम्यान एक मोठा दिलासा मिळाला आहे. 

देशात लसीकरण मोहीम सुरू केली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद (Dr Kutub Mahmoood) यांनी म्हटलं आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना देखील संपेल, असंही त्यांनी सांगितलं. "कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा व्हायरस लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तस तसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ" असं डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. 

"आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे"

"कोरोना व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत आहे आणि माणसातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील. हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. व्हायरस आणि माणूस यांच्यात हे एक साधर्म्य आहे. माणसाच्या आणि व्हायरसच्या हालचाली सुरू आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण कोरोना विरुद्ध वापरली आहेत" असं डॉ. कुतुब यांनी सांगितलं.

"12 महिन्यांत जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य"

"देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी उपलब्धी आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. आणि गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना भारतीय DCGI मार्फत मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यानंतर आपातकालीन वापराची परवानगी मिळाली आणि 12 महिन्यांत आपण जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य केले आहे. ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे,” असं देखील डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: CoronaVirus Live Updates covid pandemic cant go on forever will end soon says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.