छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:24 PM2019-09-24T16:24:14+5:302019-09-24T16:30:56+5:30

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Chhattisgarh 3 civilians killed in IED blast planted by naxals, in Kanker district | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे.तीन जणांचा मृत्यू झाला आहे.कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरातील कोसरोंडा आणि तुमापाल गावादरम्यान ही घटना घडली.

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरात नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरातील कोसरोंडा आणि तुमापाल गावादरम्यान ही घटना घडली. काही दिवसांपासून परिसरात रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी हे डिझेल टँकर नेले जात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती मिळत आहे.

छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी (24 ऑगस्ट) चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली होती. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले होते. 
 

Web Title: Chhattisgarh 3 civilians killed in IED blast planted by naxals, in Kanker district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.