अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:38 IST2025-12-02T15:38:24+5:302025-12-02T15:38:53+5:30

लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

bride breaks off marriage in 20 minutes says i want to come back groom replies deoria | अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न

अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न

लग्नानंतर अवघ्या २० मिनिटांत उत्तर प्रदेशातील देवरिया येथील सासरच्या घरातून निघून गेलेल्या वधूने आता नवरदेवाला फोन करून परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र नवरदेवाने स्पष्ट नकार दिला आहे. तो म्हणतो की, या घटनेने त्याची अब्रू गेली आहे आणि लग्नात खर्च केलेले ५ लाख रुपये वाया गेले आहेत. तो आता समाजात कोणालाही तोंड दाखवू शकत नाही.

२७ नोव्हेंबर रोजी मुलीने त्याला फोन करून परत येण्यास तयार असल्याचं सांगितलं, पण नवरदेवाने स्पष्ट नकार दिला. दुःख व्यक्त करताना वर म्हणाला, "माझ्याकडे आता काहीही उरलेलं नाही, माझी सर्व अब्रू गेली आहे. मी समाजात कोणालाही माझं तोंड दाखवू शकत नाही. लग्नात खर्च केलेले तब्बल ५ लाख रुपये वाया गेले"

२५ नोव्हेंबर रोजी लग्न झालं आणि वधू २६ नोव्हेंबर रोजी तिच्या सासरच्या घरी पोहोचली. लग्नानंतरच्या एका कार्यक्रमादरम्यान वधूने अचानक तिच्या कुटुंबाला फोन केला आणि ती आता सासरी राहणार नाही असं जाहीर केलं. २० मिनिटांत लग्न मोडलं. यानंतर सासरच्यांना मोठा धक्का बसला आणि बदनामीच्या भीतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला.

मुलीचे कुटुंबही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला. शेवटी कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन लेखी करार झाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांचं सामान परत केलं आणि लग्न मोडलं. वधू तिच्या कुटुंबाकडे परतली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सगळीकडे या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title : दुल्हे का दर्द: दुल्हन ने 20 मिनट में शादी तोड़ी, ₹5 लाख का नुकसान।

Web Summary : उत्तर प्रदेश में एक दूल्हा तबाह हो गया जब उसकी दुल्हन ने शादी के 20 मिनट बाद उसे छोड़ दिया, जिससे उसे ₹5 लाख और उसकी प्रतिष्ठा का नुकसान हुआ। लौटने की उसकी गुहार के बावजूद, उसने सामाजिक शर्म और वित्तीय नुकसान का हवाला देते हुए इनकार कर दिया।

Web Title : Groom's grief: Bride calls off wedding in 20 minutes, ₹5L lost.

Web Summary : A UP groom is devastated after his bride left 20 minutes after the wedding, costing him ₹5 lakh and his reputation. Despite her change of heart and plea to return, he refused, citing societal shame and financial loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.