Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:50 PM2020-02-11T14:50:17+5:302020-02-11T14:57:31+5:30

एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.

BJP leader Manoj Tiwari is trolling social media | Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल

Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निकालाचे चित्र आता स्पष्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आम आदमी पार्टी पुन्हा एकदा दिल्लीत विजयी झेंडा फडकवणार असल्याचे दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या दिशीने जात असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

तिवारी यांनी 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर ट्वीट करत म्हंटले होते की, सर्व सर्वे खोटे ठरणार असून, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळतील आणि आम्ही सरकार सुद्धा बनवू. त्यांनतर एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते.

मात्र, आता निकालाचे चित्र वेगळे दिसत असून आम आदमी पार्टी 62 तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. तर पुन्हा केजरीवाल सरकार दिल्लीत स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

 

 

Web Title: BJP leader Manoj Tiwari is trolling social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.