विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 07:43 IST2025-06-14T07:42:48+5:302025-06-14T07:43:47+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: विमान प्रवासाठी २०१७ हे वर्ष सर्वांत सुरक्षित ठरले आहे. त्यावर्षी केवळ ५९ मृत्यू झाले होते. गेल्या पाच वर्षांत विमान अपघात बऱ्यापैकी कमी झाले आहेत. रस्ते आणि जल प्रवासापेक्षा विमान प्रवास हा सुरक्षित मानला जातो.

विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
नवी दिल्ली : विमान प्रवासाठी २०१७ हे वर्ष सर्वांत सुरक्षित ठरले आहे. त्यावर्षी केवळ ५९ मृत्यू झाले होते. गेल्या पाच वर्षांत विमान अपघात बऱ्यापैकी कमी झाले आहेत. रस्ते आणि जल प्रवासापेक्षा विमान प्रवास हा सुरक्षित मानला जातो. मात्र सर्वांत भीषण विमान अपघात हे रनवेवर टक्कर झाल्यामुळे झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत विमान अपघातांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. ४७% अपघात हे लँडिंगवेळी तर २०% अपघात टेकऑफ दरम्यान होतात.