विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:56 PM2020-01-15T23:56:03+5:302020-01-16T00:30:05+5:30

श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Trustee dispute in court | विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

विश्वस्तपदाचा वाद न्यायालयात

googlenewsNext
ठळक मुद्देकाळाराम मंदिर : माजी विश्वस्तांनी घेतली हरकत

पंचवटी : श्री काळाराम संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दहा विश्वस्तांच्या जागांपैकी अध्यक्षांनी निवडलेल्या तीन जागांवर एका माजी विश्वस्ताने हरकत घेत उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने तिघा विश्वस्तांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून, त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा या पुजारी घराण्यातील, तर तीन विश्वस्त जुन्या विश्वस्तातून निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत व उर्वरित चार जागा धर्मादाय आयुक्तांकडून निवडल्या जातात. अध्यक्षांनी जुन्या विश्वस्त मंडळातील मंदार जानोरकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, दत्तप्रसाद निकम यांची अलीकडेच नियुक्ती केली आहे.
२०१९ ते २५ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी व घटनेत नमूद असलेल्या जुन्या सदस्यातून ३ सदस्य निवडताना १४ आॅक्टोबर २०१९ रोजी बैठकीचा अजेंडा काढला आहे. त्यात बैठकीचे ठिकाण जिल्हा न्यायालयातील त्यांच्या स्वत:च्या निजी कक्षात दर्शविले आहे. मुळात संस्थेची बैठक अशा न्यायालय आवारात निजी कक्षात घेता येत नाही.
दरम्यान, धमार्दाय आयुक्तांकडून नियुक्त केल्या जाणाºया चार जागांसाठी तब्बल ७२ इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यातून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, अ‍ॅड. दिलीप कैचे, शुभम मंत्री आणि डॉ. मिलिंद तारे या चौघांची निवड करण्यात आली. तर पुजारी घराण्यातून धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या पैशाचा गैरवापर
दत्तप्रसाद निकम हे संस्थेचे संचालक असताना त्यांनी संस्थेच्या कार्यक्रमात पत्नीच्या नावे गायनापोटी ११ हजार रुपये मानधन मिळवून दिले आहे. संस्थेच्या संचालकांनी स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्तीसाठी संस्थेच्या पैशांचा वापर करणे हे मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्याने गुन्हा असल्याची हरकत माजी विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे.

धर्मादाय आयुक्तांनी चौघा विश्वस्तांची निवड केली, मात्र त्यांचा काळाराम मंदिराशी काही एक संबंध नाही. अनेक जण वर्षानुवर्षे देवाची सेवा करतात त्यांना संधी दिली गेली पाहिजे होती. स्थानिकांना डावलून कोणत्या निकषावर विश्वस्त नियुक्त केले हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
- रावसाहेब कोशिरे, अध्यक्ष,
रास्ते आखाडा तालीम संघ

Web Title: Trustee dispute in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.