रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:08 PM2020-03-14T16:08:14+5:302020-03-14T16:08:27+5:30

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Rotation of Palakhed canal for Rabi season | रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन

Next

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गासह प्रहार संघटनेने प्रशासनाकडे केली होती.
यावर्षी धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.
या आवर्तनातून तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे भरण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मागील महिन्यात रब्बीसाठी आवर्तन दिल्याने शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना या आवर्तनाचा लाभ झाला होता. सध्या कडक उन्हाचे दिवस सुरू झाल्याने पिकांना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणीटंचाईचा फटका बसला असल्याने कालव्यास आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात पाटपाण्याच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंबबागा असून, त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. पालखेडचे पहिले आवर्तन वेळेवर सुटल्याने तसेच विहिरींना पाणी असल्याने पाण्याची समस्या जाणवली नाही, परंतु गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून बºयाच तालुक्यातील सर्वच विहिरींनी तळ गाठल्याने पिके करपण्याचा धोका निर्माण झाला. अशातच प्रशासनाच्या नेहमीच्या कारभारानुसार पाण्याचे नियोजन येत्या वीस तारखेनंतर येणार होते, परंतु प्रहार संघटनेने व शेतकरी यांनी निवेदनाद्वारे परिस्थिती समजावून सांगत आंदोलनाचा इशारा दिला. यामुळे संबंधित प्रशासनाने पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Rotation of Palakhed canal for Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी