अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 07:52 PM2019-12-17T19:52:09+5:302019-12-17T19:53:05+5:30

ग्रामस्थही त्रस्त: फेऱ्या वाढविण्याची मागणी पंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाºया तसेच ...

nashik,student,inconvenience,due, nsufficient,buses | अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

googlenewsNext

ग्रामस्थही त्रस्त: फेऱ्या वाढविण्याची मागणी
पंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बस सेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आण ि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडगावातून दररोज असंख्य विद्यार्थी तसेच चाकरमाने कामासाठी नाशिक शहरात येत असतात. मात्र बस फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बस मध्ये प्रवाशांची गर्दीत बसून प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी धावत्या बसमध्ये करण्याचा प्रयत्न काही विद्यार्थी बस मधून पडून जखमी झाल्याची घटना घडली होते.
आडगाव नाशिकला येणाºया अनेक बस कधी कधी बंद पडत असल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल होतात त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अन्य प्रवासी वाहनांचा वापर करावा लागतो. आडगाव पासून शहरातील शाळा सात ते आठ किलोमीटर असल्याने अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळा तसेच महाविद्यालयापर्यंत नेऊन पोहोचिवण्याचे काम करावे लागते.
आडगावातून नाशिक शहरात बस येत असल्या तरी त्यातील काही बस बंद पडत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना धक्का मारावा लागत असण्याचे चित्र बघायला मिळते आडगावातील लोकसंख्या लक्षात घेऊन एसटी प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासनाने आडगाव ते नाशिक शहरात येणार्या बस फेर्या वाढविण्याची गरज आहे.

Web Title: nashik,student,inconvenience,due, nsufficient,buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.