शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मातोरी-मखमलाबाद येथील स्थानिक शेतकऱ्यासमोर चारा-पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 19:08 IST

मातोरी : दुष्काळाच्या झळा नाशिक जिल्ह्याला होरपळून काढत आहे. पाण्यावाचून माणसांचीच नाही तर मुक्या जिवांची लाहीलाही होत आहे. यंदा ...

मातोरी : दुष्काळाच्या झळा नाशिक जिल्ह्याला होरपळून काढत आहे. पाण्यावाचून माणसांचीच नाही तर मुक्या जिवांची लाहीलाही होत आहे. यंदा भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असताना सर्व जीव पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे दिसत आहे. मातोरी, म्हसरूळ, मखमलाबाद येथील स्थानिक शेतकऱ्यांसमोर चारा- पाण्याची समस्या उभी असतानाच गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काठीवाडी समाजाच्या पुढे या दुष्काळाचे आव्हान आवासून उभे आहे. जनावरे जगवायची कशी हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.यंदा दुष्काळी परिस्थिती सर्वत्र दिसत आहे, त्यानुसार शासनाने गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी योग्य ती सोयदेखील केली आहे. ही सोय झाली दुष्काळी भागातील, परंतु दुष्काळ जाहीर नसलेला पण दुष्काळाची झळ सहन करणाऱ्यांचे काय, असा प्रश्न आहे. नाशिक शहरातील दरी, मखमलाबाद, मसरूळ गावांमध्ये काठीवाडी समाजाच्या तीन पिढ्या गायी पाळण्याचा व्यवसाय करत आहेत. तिन्ही ठिकाणच्या गो-पालकांना स्वत:ची जागा नाही, दरी येथील गावकीच्या जागेत तर म्हसरूळ, मखमलाबाद येथील काठीवाडी समाज भाडोत्री जागेत गायींचा सांभाळ करत आहेत. गायी चारण्यासाठी डोंगरावर, शेतकºयाच्या शेतात, तर ओहळात घेऊन जात असत. डोंगरावरील चारा संपल्याने शेतातून चारा आणणे हाच पर्याय होता. मागील महिन्यापर्यंत शेतकºयांनी पाण्याची सोय शेतात केली होती. तर कालव्याला पाणी आल्याने जनावरांचा पाणीपुरवठा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला होता. पण आता विहिरीमध्येही पाणी राहिले नसल्याने जनावरांना पाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत आहे. दिवसभर जिथून पाणी मिळेल तेथून म्हणजेच चार ते पाच किलोमीटरवरून बैलगाडीच्या माध्यमातून पाणी आणावे लागत आहे, तर रानातील चारा शिल्लक न राहिल्याने जनावरे जगवायची कशी, त्यांना चारा आणायचा कोठून हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. प्रत्येकाकडे साधारण १००च्या आसपास जनावरे आहेत, मात्र त्यांना निवारा नाही, त्यामुळे कोठेही एखाद्या झाडाखाली ही जनावरे घेऊन जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. शासनाकडून त्यांना कोठेही कोणतीही चारा छावणी किंवा पाणीपुरवठ्याची सोय केल्याचे दिसत नाही. चारा-पाण्याची सोय करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.-------------

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ