२८ लाख शिवभोजनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:21 PM2020-05-27T22:21:46+5:302020-05-27T23:57:16+5:30

नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागरिकांना होत असून, राज्यात दि. १ ते २६ मेपर्यंत ८३० शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे

 Benefit of 28 lakh Shiva food | २८ लाख शिवभोजनचा लाभ

२८ लाख शिवभोजनचा लाभ

googlenewsNext

नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागरिकांना होत असून, राज्यात दि. १ ते २६ मेपर्यंत ८३० शिवभोजन केंद्रांतून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर राज्यातील एक कोटी ४६ लाख १५ हजार १७० शिधापत्रिकाधारकांना ६७ लाख ४५ हजार ४०० क्विंंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ९४ हजार २६१ क्विंंटल गहू, १५ लाख ३२ हजार २१६ क्विंंटल तांदूळ, तर २१ हजार २८४ क्विंंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले; परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख ७ हजार ४२७ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत आॅनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मेपासून एकूण एक कोटी ९ लाख ६२ हजार ७३४ रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील ४ कोटी ९२ लाख १४ हजार ५८४ लोकसंख्येला २४ लाख ६० हजार ७३० क्विंंटल तांदळाचे वाटप झाले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणाडाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५३ हजार ३५१ क्विंंटल डाळीचे वाटप केले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.
---------------------
उपाययोजनेसाठी निधी
४ राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल (केसरी) लाभार्थींना मे व जून २०२० या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन ७ लाख ५८ हजार १९० क्विंंटल धान्याचे वाटप केले.

 

Web Title:  Benefit of 28 lakh Shiva food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक