युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:36 PM2019-09-23T19:36:47+5:302019-09-23T19:38:21+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे.

The alliance will replace the alliance with numbers | युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

युतीच्या जागावाटपात आकडेच घालणार खोडा

Next
ठळक मुद्देसेना कमी जागा घेणार की भाजप स्वीकारणार १०-५ चा फार्म्यला?सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेत फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला लागू होणार की, सेनेला १२० जागा देत भाजपा १६० जागा लढविणार असे जागावाटपाचे वेगवेगळे आकडे जाहीर होत असताना निवडणुकीत युती झाल्यास नाशिक जिल्ह्यातही भाजप-सेनेचे जागावाटप कसे असेल, या विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. २००९ मध्ये झालेल्या युतीच्या १०-५ जागावाटप यंदा भाजप स्वीकारणार की, शिवसेना कमी जागा घेऊन भाजपला चाल देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत असलेल्या भाजपकडून जिल्ह्यात आणखी दोन ते तीन अतिरिक्त जागांचा आग्रह धरला जात असून, त्यामुळे युतीच्या जागावाटपात आकडेच खोडा घालतील, असे दिसू लागले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याची माहिती सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांना दिली त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. प्रत्यक्षात विधानसभेसाठी भाजप सेनेला निम्म्या जागा देण्यास तयार नसल्याचे बोलले जात असून, सेनेला १२० ते १२५ जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे जागावाटपावरूनच युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यपातळीवर जागावाटपात वेगवेगळे आकडे दररोज जाहीर होत असताना नाशिक जिल्ह्यातही भाजप व सेनेच्या इच्छुकांमध्ये जागा वाटपाच्या आकड्यांवरच चर्चा होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी पंधराही मतदारसंघांत उमेदवार उभे केले. परंतु यंदा अजून तरी युतीची चर्चा सुरू असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याविषयी उत्सुकता आहे. सन २००९ मध्ये सेना-भाजप एकत्र लढल्यावर सेनेने दहा तर भाजपने पाच जागांवर निवडणूक लढविली होती. सेनेकडून जिल्ह्याच्या जागावाटपात त्याच फार्म्युल्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यता असली तरी, प्राप्त परिस्थितीत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढल्याचे निमित्त करून भाजप पाच जागा घेण्यास तयार होणार काय असा प्रश्न आहे. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली असून, कळवण, नांदगाव, इगतपुरी मतदारसंघ पक्षाला मिळावे यासाठी इच्छुकांकडून पक्षावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे भाजप १०-५ चे सूत्र स्वीकारणार की, सेना आपल्या ताब्यातील जागा भाजपला सोडणार यावरून आकडेवारीचा खेळ मांडला जात आहे.

Web Title: The alliance will replace the alliance with numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.