खाजगी कंपनीचा टाॅवर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:20+5:302021-03-25T04:28:20+5:30
स्वच्छतेची गरज नंदुरबार : तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छतेअभावी रोगराईची भीती आहे. तालुक्यातील गावांमध्ये गटारे नादुरुस्त असल्याने सांडपाण्याची समस्या ...

खाजगी कंपनीचा टाॅवर सुरू करा
स्वच्छतेची गरज
नंदुरबार : तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छतेअभावी रोगराईची भीती आहे. तालुक्यातील गावांमध्ये गटारे नादुरुस्त असल्याने सांडपाण्याची समस्या आहे. सांडपाणी योग्य पद्धतीने काढण्यासाठी गटारांची निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरी भागात चिंचविक्रीतून रोजगार
नंदुरबार : शहरातील विविध भागांत चिंचविक्री करणारे दिसून येत आहेत. माफक दरात आंबट गोड चिंचा उपलब्ध होत आहे. तालुक्यातील विविध भागांतील झाडांवर मोठ्या प्रमाणावर चिंचा लगडल्याचे दिसून येत आहे. या चिंचा तोडून ग्रामीण भागातील युवक शहरी भागात विक्रीसाठी आणत आहेत. यातून त्यांना दरदिवशी रोजगार उपलब्ध होत आहे. तालुक्यासोबत तळोदा व शहादा तालुक्यांतही चिंचातोडणीचे काम सुरू आहे.
वळणरस्त्यावर भरधाव डम्पर पुन्हा वाढू लागले
नंदुरबार : शहरातील नवापूर चाैफुली ते तळोदा रोडपर्यंतच्या वळणरस्त्याने वाळू वाहणारे डम्पर पुन्हा धावत आहेत. यातून या मार्गाने दिवसा प्रवास करतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत. या डम्परचा वेग मर्यादेत ठेवण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात मिळतोय प्रतिसाद
नंदुरबार : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दक्षता घेतली जात असल्याचे चित्र असून मास्कचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागात मास्कची विक्री वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.
टोप्या आणि रुमालांची दुकाने सुरू
नंदुरबार : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरातील विविध भागांत बागायती रुमाल आणि टोप्या यांची विक्री सुरू झाली आहे. प्रामुख्याने फॅन्सी टोप्यांना युवक व लहान बालकांकडून पसंती दिली जात आहे. तर, बागायती रुमालांची विक्री वाढली आहे.
खड्डे बुजवलेच नाहीत
नंदुरबार : कोळदे ते नंदुरबारदरम्यान रस्त्यावरचे खड्डे नागरिकांनी पाठपुरावा करूनही योग्य पद्धतीने बुजवलेले नाहीत. हे खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांची असून खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असल्याची माहिती देण्यात येत आहे. खड्ड्यांचा आकारही वाढला आहे.
पुलांची तपासणी करणे रखडले
नंदुरबार : पावसाळ्यात पूल पडणे व रस्ते खचण्याच्या दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी पुलांची तपासणी करून त्यांची डागडुजी करण्याचे आदेश आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे दिसून आले आहे.